शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पालकांकडून चक्क चारचाकी गाडी भेट देऊन ‘गुरूं’चा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 01:07 IST

पिंपळे खालसा : १९७१ पासून ४३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; २०१४ पासून तीन शिक्षकांना भेट

कोरेगाव भीमा : पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेने १९७१ पासून ४३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची यशस्वी परंपरा कायम राखत यावर्षी तीन विद्यार्थी राज्यात जिल्हा गुणवत्ता यादीत २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. एका विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असल्याने यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांच्यावतीने मार्गदर्शक शिक्षिकेस चारचाकी गाडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

पिंपळे खालसा ग्रामस्थांचा शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या योगदानासाठीची हे भेट राज्यात कात्ौुकाचा विषय झाली आहे. येथील शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्याची परंपरा १९७१ पासून कायम आहे. दरवर्षी या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर याअगोदर चौथीचे, तर गेल्या काही वर्षांपासून पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये झळकत आहेत. यात उत्तीर्ण होणाऱ्या मुलांच्या पालकांच्यावतीने शिक्षकांना लॅपटॉप, फ्रीज व इतर भेटवस्तू देण्यात येत होत्या. मात्र २०११ पासून शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करणाºया शिक्षकांना दुचाकी भेट देण्यात येत होती. शिष्यवृत्तीच्या यशाच्या परंपरा वाढल्याने ग्रामस्थांनी २०१४ पासून सर्व पालकांच्यावतीने शिक्षकांना तीन चारचाकी वाहने भेट देण्यात आलेली आहेत.यावर्षी शाळेचे १९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. एका विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्यावतीने मार्गदर्शकशिक्षिका ललिता अशोक धुमाळ यांना चारचाकी भेट दिली.याप्रसंगी सरपंच राजाराम धुमाळ, उपसरपंच संदीप सुरसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर धुमाळ, शहाजी धुमाळ, संपत धुमाळ, विशाल धुमाळ, रमेश धुमाळ, समीर धुमाळ, शिवाजी धुमाळ, संतोष धुमाळ, पुष्पा धुमाळ, मंगल धुमाळ, शुभांगी धुमाळ, गुलाबराव धुमाळ, अप्पासाहेब धुमाळ यांच्यासह सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत शाळा : १९७१ पासून पिंपळे खालसा जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेची परंपरा कायम राहण्यासाठी व जास्तीत जास्त मुले शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता यादीत झळकण्यासाठी जून ते आॅक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत व आॅॅक्टोबरनंतर सकाळी ८ ते सायंकाळी ९ पर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले जाते. पालकांचा विश्वास असल्याने परीक्षेत आजपर्यंत ४३२ विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे मार्गदर्शकशिक्षिका ललिता धुमाळ यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना भेटगुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी मार्गदर्शक शिक्षिकेस चारचाकी भेट देऊन सन्मानित करण्यात आले, तर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या हर्षदा शितोळे, ओम धुमाळ, गुरुदत्त धुमाळ या विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शकशिक्षिका ललिता धुमाळ यांच्यावतीने घड्याळ भेट देऊन सन्मानित केले.

टॅग्स :PuneपुणेGuru Purnimaगुरु पौर्णिमाRakhiराखी