शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पालकांकडून चक्क चारचाकी गाडी भेट देऊन ‘गुरूं’चा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 01:07 IST

पिंपळे खालसा : १९७१ पासून ४३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; २०१४ पासून तीन शिक्षकांना भेट

कोरेगाव भीमा : पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेने १९७१ पासून ४३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची यशस्वी परंपरा कायम राखत यावर्षी तीन विद्यार्थी राज्यात जिल्हा गुणवत्ता यादीत २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. एका विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असल्याने यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांच्यावतीने मार्गदर्शक शिक्षिकेस चारचाकी गाडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

पिंपळे खालसा ग्रामस्थांचा शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या योगदानासाठीची हे भेट राज्यात कात्ौुकाचा विषय झाली आहे. येथील शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्याची परंपरा १९७१ पासून कायम आहे. दरवर्षी या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर याअगोदर चौथीचे, तर गेल्या काही वर्षांपासून पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये झळकत आहेत. यात उत्तीर्ण होणाऱ्या मुलांच्या पालकांच्यावतीने शिक्षकांना लॅपटॉप, फ्रीज व इतर भेटवस्तू देण्यात येत होत्या. मात्र २०११ पासून शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करणाºया शिक्षकांना दुचाकी भेट देण्यात येत होती. शिष्यवृत्तीच्या यशाच्या परंपरा वाढल्याने ग्रामस्थांनी २०१४ पासून सर्व पालकांच्यावतीने शिक्षकांना तीन चारचाकी वाहने भेट देण्यात आलेली आहेत.यावर्षी शाळेचे १९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. एका विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्यावतीने मार्गदर्शकशिक्षिका ललिता अशोक धुमाळ यांना चारचाकी भेट दिली.याप्रसंगी सरपंच राजाराम धुमाळ, उपसरपंच संदीप सुरसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर धुमाळ, शहाजी धुमाळ, संपत धुमाळ, विशाल धुमाळ, रमेश धुमाळ, समीर धुमाळ, शिवाजी धुमाळ, संतोष धुमाळ, पुष्पा धुमाळ, मंगल धुमाळ, शुभांगी धुमाळ, गुलाबराव धुमाळ, अप्पासाहेब धुमाळ यांच्यासह सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत शाळा : १९७१ पासून पिंपळे खालसा जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेची परंपरा कायम राहण्यासाठी व जास्तीत जास्त मुले शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता यादीत झळकण्यासाठी जून ते आॅक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत व आॅॅक्टोबरनंतर सकाळी ८ ते सायंकाळी ९ पर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले जाते. पालकांचा विश्वास असल्याने परीक्षेत आजपर्यंत ४३२ विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे मार्गदर्शकशिक्षिका ललिता धुमाळ यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना भेटगुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी मार्गदर्शक शिक्षिकेस चारचाकी भेट देऊन सन्मानित करण्यात आले, तर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या हर्षदा शितोळे, ओम धुमाळ, गुरुदत्त धुमाळ या विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शकशिक्षिका ललिता धुमाळ यांच्यावतीने घड्याळ भेट देऊन सन्मानित केले.

टॅग्स :PuneपुणेGuru Purnimaगुरु पौर्णिमाRakhiराखी