शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

राज्याचे गृहमंत्री म्हणाले, "समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:19 IST

‘एनसीबी’चे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...

पिंपरी : अमली पदार्थ बाळगल्याच्या, त्याचे सेवन केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने आर्यन खान याला क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे आरोपपत्रातून (चार्जशीट) आर्यन खानचे नाव वगळण्यात आले आहे. अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणी ‘एनसीबी’चे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

गृहमंत्री वळसे पाटील हे शनिवारी (दि. २८) चिंचवड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने अमली पदार्थ बाळगून त्याचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी त्याला न्यायालयाने निर्दोष सोडले. 

गृहमंत्री वळसे पाटील याबाबत म्हणाले, आर्यन खान याच्यावर जे आरोप केले गेले होते त्याच्यामध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे चार्जशीटमधून आर्यन खानचे नाव वगळले. मला अस वाटतं की केंद्राने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि संबंधिताविरुद्ध कारवाईची सूचना दिलेली आहे. अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. ती भूमिका आमचीसुद्धा राहील. मला असे वाटते की, वानखेडे यांच्यावर कारवाई होईल. त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आहे त्याबाबत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 

राणा दाम्पत्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाही-खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे. याबाबत विचारले असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राणा दाम्पत्याचा आंतरराष्ट्रीय प्रश्न नाही. त्यामुळे त्याला एवढे महत्व द्यायची गरज नाही.

टॅग्स :PuneपुणेSameer Wankhedeसमीर वानखेडेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलAryan Khanआर्यन खान