शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घरांची पडझड : कामगारांना घर देता का घर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:38 IST

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील धवलपुरी, रत्नपुरी, लालपुरी येथील कामगारांच्या राहत्या घरांची पडझड झाल्याने हजारो कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील धवलपुरी, रत्नपुरी, लालपुरी येथील कामगारांच्या राहत्या घरांची पडझड झाल्याने हजारो कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.शेती महामंडळातील कामगारांना १९६५साली कायमचे राहण्यासाठी देण्यात आलेल्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झालेले असल्याने पडक्या धोकादायक घरात जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आलेली आहे. येथील कामगारांवर ‘घर देता का घर’ अशी आर्त हाक मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील जमिनीवर कसलेही उत्पादन न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामगारांना २००७ सालापासून आपली उपजीविका भागवण्यासाठी आधार नसल्याने व स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाच्याच घरात भाडेतत्त्वावर राहण्याची वेळ आली आहे. हजारो कुटुंबे आजही महामंडळाच्या आशेवर जीव मुठीत धरून पडक्या घरात आजही वास्तव्य करताना दिसत आहेत.लोकप्रतिनिधींवर कामगारांचा अविश्वासया कामगारांना ना घर, ना शेती, कोठेही उपलब्ध नसल्याने व शेती महामंडळाच्या राहत्या घरावर पत्र्याचे पान टाकण्यास कोणत्याही मंडळाचा अधिकारी फिरकत नसल्यामुळे गळक्या पडझड झालेल्या व जीर्ण झालेल्या धोकादायक घरात राहावे लागत आहे. पावसाळ्यात या घरात संसार पाण्यात राहातोय. पत्रे गळत असल्याने ताडपत्री अंथरूनत्यावर मात करण्यासाठी धडपड करतानादिसतात.मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी या हाजारो कुटुंबांना आजपर्यंत फक्त आश्वासन देऊन गेले ते परत फिरकलेच नाहीत. प्रत्येक सभेत या कामगारांना न्याय देण्याची आश्वासने लोकप्रतिनिधी न विसरता देत असतात. कामगार टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात मात्र मतदान घेऊन पुन्हा पाच वर्षांनी नव्याने सभा घेताना दिसतात, असा राजकारणी लोकप्रतिनिधींवर कामगार अविश्वास दर्शविताना दिसत आहेत.या भागातील खासदार सुप्रीया सुळे यांनी १० वषार्पूर्वी धवलपूरी रत्नपूरी भागातील कामगारांच्या घरांची पहाणी करून झालेली दैयनीय अवस्था लक्षात घेऊन न्याय देण्यासाठी मंत्रालयासमोर कामगारासहीत उपोषण करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आज १० वर्ष पलटून गेले मात्र खासदार परत न आल्याने राजकारणी माणसावरचा विश्वास उडाला आहे. या कामगारांची शेतीमहामंडळी ८० कोटी असून व राहाते घर व दोन गुंठा जागा देण्यासाठी औरंगाबाद खंडपिठाने निर्णय देऊनही देण्यात आलेले नसल्याने हे कामगार घर का ना घाट का अशी अवस्था झालेली आहे. शेतीमहामंडळाने हजारो हेक्टरी जमिनी दुसºया धडधांडग्याना भाडे तत्वावर देण्यात आलेले आहेत. कोट्यावधी रुपए शेतीमहामंडळाला फायदा झालेला आहे. त्या पैसातून कामगारांची देणे दिल्यास कामगारांना न्याय मिळणार आहे. राहाते घर व परिसरात दोन गुंठे जागा उपलब्ध करून दिल्यास त्या कामगारांना न्याय मिळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेHomeघर