शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

घरांची पडझड : कामगारांना घर देता का घर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:38 IST

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील धवलपुरी, रत्नपुरी, लालपुरी येथील कामगारांच्या राहत्या घरांची पडझड झाल्याने हजारो कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील धवलपुरी, रत्नपुरी, लालपुरी येथील कामगारांच्या राहत्या घरांची पडझड झाल्याने हजारो कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.शेती महामंडळातील कामगारांना १९६५साली कायमचे राहण्यासाठी देण्यात आलेल्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झालेले असल्याने पडक्या धोकादायक घरात जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आलेली आहे. येथील कामगारांवर ‘घर देता का घर’ अशी आर्त हाक मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील जमिनीवर कसलेही उत्पादन न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामगारांना २००७ सालापासून आपली उपजीविका भागवण्यासाठी आधार नसल्याने व स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाच्याच घरात भाडेतत्त्वावर राहण्याची वेळ आली आहे. हजारो कुटुंबे आजही महामंडळाच्या आशेवर जीव मुठीत धरून पडक्या घरात आजही वास्तव्य करताना दिसत आहेत.लोकप्रतिनिधींवर कामगारांचा अविश्वासया कामगारांना ना घर, ना शेती, कोठेही उपलब्ध नसल्याने व शेती महामंडळाच्या राहत्या घरावर पत्र्याचे पान टाकण्यास कोणत्याही मंडळाचा अधिकारी फिरकत नसल्यामुळे गळक्या पडझड झालेल्या व जीर्ण झालेल्या धोकादायक घरात राहावे लागत आहे. पावसाळ्यात या घरात संसार पाण्यात राहातोय. पत्रे गळत असल्याने ताडपत्री अंथरूनत्यावर मात करण्यासाठी धडपड करतानादिसतात.मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी या हाजारो कुटुंबांना आजपर्यंत फक्त आश्वासन देऊन गेले ते परत फिरकलेच नाहीत. प्रत्येक सभेत या कामगारांना न्याय देण्याची आश्वासने लोकप्रतिनिधी न विसरता देत असतात. कामगार टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात मात्र मतदान घेऊन पुन्हा पाच वर्षांनी नव्याने सभा घेताना दिसतात, असा राजकारणी लोकप्रतिनिधींवर कामगार अविश्वास दर्शविताना दिसत आहेत.या भागातील खासदार सुप्रीया सुळे यांनी १० वषार्पूर्वी धवलपूरी रत्नपूरी भागातील कामगारांच्या घरांची पहाणी करून झालेली दैयनीय अवस्था लक्षात घेऊन न्याय देण्यासाठी मंत्रालयासमोर कामगारासहीत उपोषण करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आज १० वर्ष पलटून गेले मात्र खासदार परत न आल्याने राजकारणी माणसावरचा विश्वास उडाला आहे. या कामगारांची शेतीमहामंडळी ८० कोटी असून व राहाते घर व दोन गुंठा जागा देण्यासाठी औरंगाबाद खंडपिठाने निर्णय देऊनही देण्यात आलेले नसल्याने हे कामगार घर का ना घाट का अशी अवस्था झालेली आहे. शेतीमहामंडळाने हजारो हेक्टरी जमिनी दुसºया धडधांडग्याना भाडे तत्वावर देण्यात आलेले आहेत. कोट्यावधी रुपए शेतीमहामंडळाला फायदा झालेला आहे. त्या पैसातून कामगारांची देणे दिल्यास कामगारांना न्याय मिळणार आहे. राहाते घर व परिसरात दोन गुंठे जागा उपलब्ध करून दिल्यास त्या कामगारांना न्याय मिळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेHomeघर