शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Pune: सुटीच्या काळातील विशेष गाड्यांनी रेल्वेला बनवले ‘मालामाल’; २ महिन्यांत २२ काेटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:08 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विशेष रेल्वे गाडीतून उत्पन्नात तीनपट वाढ झाली आहे.....

पुणे : उन्हाळी सुट्टीच्या काळात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत रेल्वेला प्रवाशांची गर्दी असते. यामुळे या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागातून १३२ जादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या दोन महिन्यांत या १३२ गाड्यांच्या २६४ फेऱ्या पूर्ण झाल्या असून, यातून पुणे विभागाला २१ कोटी ८७ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी ७ कोटी ७९ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र १४ कोटींचे जादा उत्पन्न मिळाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विशेष रेल्वे गाडीतून उत्पन्नात तीनपट वाढ झाली आहे.

उन्हाळी सुट्टीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. यामुळे दरवर्षी या काळात गर्दी होत असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून महत्त्वाच्या ठिकाणी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच यावर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होती. त्यामुळे पुणे स्थानकावर पाय ''ठेवायला जागा नव्हती. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी गेल्यावर्षीपेक्षा यंदा ७५ जादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. तसेच मतदानासाठी स्थलांतरित कामगार गावी जाण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे या काळात रेल्वेवर ताण पडत होता. तरीही प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. त्याचा फायदा पुणे विभागाला महसुलाच्या माध्यमातून झाला आहे.

दोन महिन्यांत २६४ फेऱ्या

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या गर्दीच्या हंगामात विशेष गाड्यांच्या २६४ फेऱ्या झाल्या आहेत. तरीही प्रवाशांची गर्दी कमी होताना दिसत नव्हती. काहीवेळा तिकीट विक्री बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. तसेच काही प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली होती; परंतु रेल्वे प्रशासनाच्या नियोजनामुळे जादा गाड्यांमुळे महसुलात वाढ झाली आहे.

यंदा १४ कोटी जादा उत्पन्न :

पुणे विभागातून गेल्या वर्षी ५७ विशेष जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यातून रेल्वेला ७ कोटी ७९ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता १३२ जादा गाड्या सोडल्या होत्या. यातून पुणे विभागाला २१ कोटी ८७ लाख इतका महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने १४ कोटी जादा महसूल मिळाला आहे. यातून उत्पन्नात तिप्पट वाढ झाल्याचे दिसत आहे.

उन्हाळी सुटीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी यंदा रेल्वेने जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे उन्हाळी सुटी आणि निवडणूक असल्याने मतदानाला जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेला गर्दी केली होती. यासाठी पुणे विभागातून यंदा १३२ जादा विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. यातून रेल्वेला जवळपास २२ कोटींचा महसूल मिळाला. प्रवाशांच्या सोयीसाठी यापुढे काही मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक

टॅग्स :railwayरेल्वेPuneपुणे