शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे, हेल्मेट सक्तीला तिलांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 01:14 IST

समाजात उच्च शिक्षित व उचभ्रू अशी प्रतिमा असणारे ‘आयटीयन्स’ शहर आणि उपनगर परिसरातून लाखोंच्या संख्येने दररोज हिंजवडी आयटीपार्कमध्ये नोकरीनिमित्त येत असतात. यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे.

- रोहिदास धुमाळहिंजवडी : समाजात उच्च शिक्षित व उचभ्रू अशी प्रतिमा असणारे ‘आयटीयन्स’ शहर आणि उपनगर परिसरातून लाखोंच्या संख्येने दररोज हिंजवडी आयटीपार्कमध्ये नोकरीनिमित्त येत असतात. यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे.दुचाकीसह कंपनीत प्रवेश करताना हेल्मेट सक्तीचे आहे. मात्र हेल्मेट नसल्याने आयटी अभियंते बिनधास्तपणे दुचाकी भर रस्त्यावरच पार्क करतात. वाहतूक नियमांना बगल देत आयटी पार्क परिसरात अशा हजारो दुचाकी दररोज भर रस्त्यावर बेकायदा पार्क करतात. वाहतूक नियमांचे वावडे असलेल्या आयटीयन्सकडून वाहतूक पोलिसांनी साडेचार महिन्यांत ६१ लाखांचा दंड वसूल केला आहे.पिंपरी, चिंचवड, वाकड, थेरगाव, काळेवाडी, सांगवी, ताथवडे, बाणेर, औध यापरिसरातून नोकरीनिमित्त हिंजवडी आयटीपार्कमध्ये रोज हजारोच्या संख्येने ये-जा करतात. त्यासाठी दुचाकीचा सर्वाधिक वापर होत असल्याने वाहतूककोंडी होती. मात्र, वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते. उच्च शिक्षित तसेच परफेक्ट जीवनशैली जगणाऱ्या आयटीयन्सकडे सर्व सामान्य कुतूहलाने पाहतात. त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत आपल्या मुलांनासुद्धा उच्च शिक्षित करण्याचे धेय्य बाळगतात. परंतु आयटीयन्सकडून असे नियमांचे उल्लंघन केले जाणार असेल तर ते समाजात काय आदर्श उभा करत आहेत याचे आत्मपरीक्षण व्हावे़आयटीनगरीत येतात दररोज लाखो वाहनेहिंजवडी वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या साडेचार महिन्यांत १२०१८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ६१ लाख ५६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. आयटीपार्क परिसरात १२६ हून अधिक आयटी कंपन्या आहेत. इंजिनिअरिंग, फार्मा व इतर कंपन्या मिळून हा आकडा तीनशेहून अधिक आहे.आयटीनगरीत दररोज सुमारे तीन लाखांहून अधिक आयटीयन्स येत असतात. जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हिंजवडी आयटीपार्कने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात आणि दंड भरण्यात येथील आयटीयन्सची संख्या जास्त आहे. आयटीयन्सला नियमांचे वावडे आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येकावर कारवाई होत असते. मग तो कोणीही असो. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडते. आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी नियम पाळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कारवाई अटळ आहे.- किशोर म्हसवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वाहतूक विभाग, हिंजवडीविना हेल्मेट कंपनीमध्ये प्रवेश दिला जात नाही. हे दुचाकी वापरणाºयांना माहीत आहे. रस्त्यावर दुचाकी पार्क करणे चुकीचे आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरूच असते. त्यामुळे दुचाकीस्वारांवर चपराक बसेल. आयटीपार्कमधील सर्व दुचाकीस्वारांनी किमान स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरले पाहिजे.- संदीप देशमुख, आयटी अभियंता

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे