शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

कोरोनामुळे गेले ४३ दिवस बंद असलेले हिंजवडी आयटी पार्क आजपासून सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 13:33 IST

अर्थात अटी शर्ती लागू असणारच

ठळक मुद्देकंपन्यामध्ये ३३ टक्के मनुष्यबळ उपस्थित ठेवा : सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी घ्या  

हिंजवडी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ४३ दिवस बंद असलेले हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील कामकाज काही प्रमाणात सुरू होणार आहे. बुधवारपासून प्रत्येक कंपनीने ३३ टक्के कर्मचारी संख्येवर कामकाज सुरू करावे, कर्मचारी सुरक्षा आणि स्वच्छतेची जबाबदारी कंपन्यानी घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने हिंजवडी, माण, मारूंजी या तीन झोनमध्ये विस्तरलेल्या सुमारे सव्वाशे  कंपन्यांतून तब्बल चार लाख आयटी अभियंते काम करतात. लॉकडाऊनमुळे गेले दीड महिना मोठा शुकशुकाट होता. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्राम होमची सुविधा उपलब्ध करून दिल्याने बऱ्यापैकी कामकाज सुरू होते. त्यातील ७० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्राम होम शक्य होते. परंतु अन्य कर्मचाºयांना कंपनीत येणे आवश्यक होते. हिंजवडीतील आयटी पार्क हा  पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगत असला तरी, रेडझोन नसल्याने कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी काही कंपन्यांनी केली होती. त्यानुसार प्रत्येक कंपनीने ३३ टक्के कर्मचारी संख्येवर कामकाज सुरू करावे, कर्मचारी सुरक्षा आणि स्वच्छतेची जबाबदारी कंपन्यानी घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. हिंजवडीचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी म्हणाले, ह्यह्यकाही अटी शर्तींवर  कंपन्या सुरू करण्याचा आदेश पोलिसांना प्राप्त झाला आहे. कंपन्या सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. प्रत्येक कर्मचारी किमान पाच फूट अंतरावर असेल. त्याशिवाय सॅनिटायझेशन, बस सुविधा आदी अटी पाळणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाकडे सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार