शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 10:56 IST

गव्याला शरीरावर झटापटीत अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या

पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात ९ डिसेंबर २०२० साली रानगवा आला होता. काेथरूडमध्ये सुमारे सात तासांपेक्षा जास्त वेळ या गव्याचा थरार सुरु होता. त्याने माणसांच्या जंगलातून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाट सापडली नाही. गव्यासाठी दुर्दैवी ठरलेल्या सात तासांमध्ये नागरिक त्याचे फाेटाे काढत राहिले. माेबाइलमध्ये चित्रिकरण करत राहिले. नागरिकांच्या गाेंगाटामुळे घाबरलेला गवा सैरावैरा धावत राहिला. अखेर वनविभागाने त्याला गुंगीचे औषध देऊन आणि जाळीच्या साहाय्याने ताब्यात घेतले. गव्याला शरीरावर झटापटीत अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. पण उपचारादरम्यान या रानगव्याचा मृत्यू झाला. 

शहरात नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूची उच्च न्यायालयाने दखल घेतली असून,महाराष्ट्र वनविभाग आणि पुणे पोलीस आयुक्त यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठविल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये १७ जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 गतवर्षी कोथरूड परिसरात रानगवा शिरल्याची घटना घडली होती. नागरी वस्तीत प्रवेश केल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमा झाली. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात हा रानगवा जखमी झाला. गर्दीला घाबरून गांगरलेल्या गव्याने तिथून निसटण्याच्या प्रयत्नात स्टीलच्या गेटला अंदाधुंद धडका दिल्या आणि त्यातही त्याला थोड्या जखमा झाल्या. शवविच्छेदन अहवालातून हे स्पष्ट झाले की हृदयविकाराच्या झटक्याने या गव्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वनरक्षक दलाचे अधिकारी गव्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘लॉयर्स फॉर अर्थ जस्टीस ’ या वकिलांच्या टीमने ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत डिसेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर, तब्बल एक वर्षाने ही याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली.

सात तासांचा झाला होता थरार 

महात्मा सोसायटीपासून साधारण तीन-चार किलोमीटर पळताना आसपासच्या एकाही नागरिकावर गव्याने हल्ला केला नाही. गव्याची धडक खूप जबरदस्त असते. गव्याच्या धडकेत कायमचे जायबंदी करण्याची किंवा वर्मी धडक बसल्यास प्राण घेण्याची ताकद असते. काेथरूडमधल्या सुमारे सात तासांमध्ये गव्याने माणसांच्या जंगलातून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाट सापडली नाही. गव्यासाठी दुर्दैवी ठरलेल्या सात तासांमध्ये नागरिक त्याचे फाेटाे काढत राहिले. माेबाइलमध्ये चित्रिकरण करत राहिले. नागरिकांच्या गाेंगाटामुळे घाबरलेला गवा सैरावैरा धावत राहिला. नागरिकसुद्धा त्याचा पाठलाग करत राहिले आणि नंतर दिवसभर साेशल मीडियातही गवा व्हायरल करत राहिले. 

टॅग्स :kothrudकोथरूडAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारforest departmentवनविभागPoliceपोलिस