शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! 'खाकी'वर्दीने बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन जपली 'सामाजिक बांधिलकी '

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 18:57 IST

बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करत पोलिसांनी जपली माणुसकी....

राजगुरुनगर  : भूकेने व्याकुळ झालेल्या एका विमनस्क माणसाचा प्राण गेला. जवळपास ४ दिवस त्याचा मृतदेह घरात तसाच पडून होता. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा कुठलाही शोध न लागल्याने पोलिस व  नागरिकांनी माणुसकी जपत या जीवाला शेवटचा निरोप दिला. या घटनेतून पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून 'पोलिसातील माणुसकी' आणि इतरांनी 'सामाजिक बांधिलकी' दाखवून दिली. या घटनेची शहरात चर्चा सुरू आहे. 

 खेड पोलिसांना पुणे-नाशिक महामार्गावर एकविरा देवी मंदिराजवळ एक बेवारस प्रेत पडलेलं असल्याची माहिती मिळते. ड्युटीवर ठाणे अंमलदार असलेले संजय नाडेकर आपल्या एका सहकाऱ्याला घेऊन घटनास्थळी पोहोचतात. एकविरा देवी मंदिराजवळ असलेल्या बांधकाम मजुरांच्या रिकाम्या पत्राशेडमध्ये अंदाजे पन्नास वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह पडलेला दिसतो.

पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोलिसांनी नातेवाईंकांचा शोध घेेणे सुुरु केले. पण नातेवाईकांचा दुपारपर्यंत कोणताही धागादोरा हाती न लागलेे नाही. संबंधित मनुष्य हा गेल्या अनेक दिवसांपासून इथे भंगार गोळा करून ते विकायचा आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. या दरम्यान तो आजारी पडला असेल आणि त्या आजारपणातच त्याचे निधन झाले असेल, असा अंंदाज व्यक्त करून मृृृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यावेळी समजले, की त्याला बरेच दिवस अन्नपाणी मिळाले नव्हते. बेवारस का असेना, परंतु भुकेने एखाद्याचे प्राण गेलेे हे समजल्यानंतर नाडेकर यांना अतिशय वाईट वाटले. त्यातच कोरोनाची साथ असल्याने पुढील सोपस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येईना.   

     नंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन आणि राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांच्याशी संपर्क करून येथील अमरधाम स्मशानभूमीच्या गॅस दाहिनीवर अंत्यविधी करण्याचे निश्चित केले. तर तेथेही दुसऱ्या अडचणीला सामोरे जावे लागले असते. ते म्हणजे अंत्यविधी करणारे दोन्ही कर्मचारी आजारी असल्यामुळे स्मशानभूमीचे व्यवस्थापन करण्यास कोणी नव्हते. 

  अशावेळी प्रदीप कासवा यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गॅसदाहिनीची सर्व व्यवस्था तयार ठेवली. आणि सायंकाळी साडेपाच वाजता ठाणे अंमलदार संजय नाडेकर, प्रविण गेंगजे , शेखर भोईर , राजेश नलावडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अमरधाम स्मशानभूमीचे अध्यक्ष व माजी सरपंच प्रदीप कासवा, श्रीकांत गुजराथी, सागर मणियार,रवींद्र गुजराथी, निलेश संभूस यांनी या अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करून बेवारस मृतदेहाला अखेरचा निरोप दिला.

 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या