शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

पानशेत धरण फुटी संकटातला ‘हिरो’ काळाच्या पडद्याआड ; महादेव शिंदे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 22:02 IST

१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले त्यावेळी महादेव शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी मारून अनेक जणांचा जीव वाचवला होता.

पिंपरी : पुण्याच्या आधुनिक इतिहासात पानशेत धरण फुटलेला १२ जुलै १९६१ हा काळा दिवस ठरला. धरण फुटून शहरात पुरस्थिती निर्माण झाली. त्या पुराच्या पाण्यात उडी मारून अनेकांचे जीव वाचवणारे तत्कालीन पोलीस कर्मचारी महादेव रामभाऊ शिंदे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने कासारवाडी येथे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील मुळचे असलेले महादेव शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण अवसरीत तर उर्वरित शिक्षण खेड येथे झाले. कुस्तीची आवड असल्याने शारीरिक तंदुरुस्तीबाबत ते आग्रही असत. १९५२ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. वानवडी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून सेवा बजावत असताना १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले. त्यावेळी महादेव शिंदे हे येरवडा परिसरात कर्तव्यावर होते. पुरामुळे अनेकजण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी मारून अनेक जणांचा जीव वाचवला. तसेच त्याचवेळी पुरात वाहून आलेला सोन्याच्या दागिन्यांचा डबा त्यांना सापडला. तो डबा आणि दागिने शिंदे यांनी पोलीस ठाण्यात जमा केला. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर एक महिला दागिने पुरात हरवल्याबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली. त्यावेळी तिला दागिन्यांचा डबा देण्यात आला. शिंदे यांच्या या प्रामाणिकपणाचा तसेच अनेकांचे जीव वाचवल्याबाबत तत्कालीन पोलीस आयुक्तांनी शिंदे यांचा सन्मान केला होता. आयुक्त यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. 

महादेव शिंदे यांचा मुलगा प्रमोद शिंदे म्हणाले, आमचे वडील शरीराने धडधाकट तर होतेच मनानेही कणखर होते. त्यामुळे अर्धांगवायूच्या धक्क्यातूनही ते सावरले. जिल्हा पोलीस मॅन्यूअल तोंडपाठ होते. मृत्यूच्या दोन तास आधी त्यांनी माझी मुलगी राधिका हिला चित्र काढून दिले. कोठे काय त्रास होत आहे, याबाबत त्यात नमूद केले होते. 

राजेंद्र शेळके म्हणाले, पोलीस म्हणून त्यांनी उत्तम सेवा केलीच मात्र सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्य केले. तसेच जनसंपर्क वाढवून अनेक माणसे जोडली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसfloodपूरDeathमृत्यू