शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदी व फडणवीस नवपेशवाईचे वारसदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 02:12 IST

माओवादी संबंध प्रकरण : भीम आर्मीच्या संस्थापकांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेशव्यांचे वारस आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारधारेची अमंलबजावणी करण्यासाठी पुणे पोलिसांनादेखील सीबीआयप्रमाणे पिंजऱ्यातील पोपट बनवले आहे, असा उल्लेख बंदी असलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेशी संबंध असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे यांनी भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर रावण यांना लिहिलेल्या पत्रात आहे.

आपण १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पुण्यात येणार असल्याचे समजले. तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे; पण तुरुंगात असल्याने ते शक्य होणार नाही, असे या पत्राच्या सुरुवातीलाच लिहिण्यात आले आहे. ढवळे यांनी लिहिलेल्या या पत्रावर त्यांच्यासह अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या सह्या आहेत. मोदी आणि फडणवीस यांच्या सरकारला नवपेशवाईशी जोडून त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्यासाठी दलित, बहुजन, अल्पसंख्याक आणि महिलांनी एल्गार परिषदचे आयोजन केले होते. मात्र, त्याचा संबंध कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेशी जोडून व त्याला माओवादी संघटनांची आर्थिक मदत होती, या संशयावरून आम्हाला अटक केली. आम्ही तुमच्याकडून अशी आशा करतो, की प्रसारमाध्यम आणि सभेच्या मार्फ त तुम्ही कोरेगाव भीमा व एल्गार परिषदेमधील सत्य भूमिका मांडाल. यातील सूत्रधार मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात पुरावे असूनही त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही.हिंदुत्व विरोधी लोक, संघटना यांना सोबत घेऊन पुढील लढाई लढली जाऊ शकते. आंबेडकरवाद्यांनीच आंबेडकरवाद्यांवर हल्ला केला, हा कोणत्या प्रकारचा तर्क आहे, हे समजणे अवघड आहे. ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जातीयवादी डोक्यातील कल्पना आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एल्गार प्रकरणात पुणे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात फेरफार केल्याचे मत नोंदविले आहे.घरात बॉम्ब ठेवणाºयांचीचौकशीदेखील नाही४डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासारख्या विवेकवादी व्यक्तींची गोळ््या घालून हत्या केली. त्यांना मारणाºयांच्या घरात जिवंत बॉम्ब मिळाले आहेत. अशा सनातन आणि शिवप्रतिष्ठानच्या प्रमुखांना साधे चौकशीसाठीही बोलवण्यात आले नाही. एका वगार्ला एक कायदा, दुसºयाला दुसरा कायदा, अशा प्रकारे सध्या काम सुरू असून हीच का लोकशाही?असा प्रश्न उपस्थित करीत हा संविधानाचा अपमान असल्याचे ढवळे यांनी पत्रात म्हटले आहे.१ एखाद्या गोष्टीला विरोध केला, तर त्यांना देशद्रोही ठरवले जात असून त्याचा अर्थ गोळ््या आणि तुरुंग, असा लावला जात आहे. आमच्या घरातून जी पत्र, इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त करण्यात आला ती पत्रे स्वत: पोलिसांनी लिहिलेली आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.२ सदर पत्र न्यायालयामार्फे त चंद्रशेखर रावण यांना देण्यात यावे, असा अर्ज ढवळे यांनी त्यांचे वकील सिद्धार्थ पाटील सोमवारी न्यायालयात केला. मात्र, यावर जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आक्षेप घेत संबंधित पत्र तपासण्याचे गरज असून त्यानंतर याबाबत भूमिका मांडू, असे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस