शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

मोदी व फडणवीस नवपेशवाईचे वारसदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 02:12 IST

माओवादी संबंध प्रकरण : भीम आर्मीच्या संस्थापकांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेशव्यांचे वारस आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारधारेची अमंलबजावणी करण्यासाठी पुणे पोलिसांनादेखील सीबीआयप्रमाणे पिंजऱ्यातील पोपट बनवले आहे, असा उल्लेख बंदी असलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेशी संबंध असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे यांनी भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर रावण यांना लिहिलेल्या पत्रात आहे.

आपण १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पुण्यात येणार असल्याचे समजले. तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे; पण तुरुंगात असल्याने ते शक्य होणार नाही, असे या पत्राच्या सुरुवातीलाच लिहिण्यात आले आहे. ढवळे यांनी लिहिलेल्या या पत्रावर त्यांच्यासह अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या सह्या आहेत. मोदी आणि फडणवीस यांच्या सरकारला नवपेशवाईशी जोडून त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्यासाठी दलित, बहुजन, अल्पसंख्याक आणि महिलांनी एल्गार परिषदचे आयोजन केले होते. मात्र, त्याचा संबंध कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेशी जोडून व त्याला माओवादी संघटनांची आर्थिक मदत होती, या संशयावरून आम्हाला अटक केली. आम्ही तुमच्याकडून अशी आशा करतो, की प्रसारमाध्यम आणि सभेच्या मार्फ त तुम्ही कोरेगाव भीमा व एल्गार परिषदेमधील सत्य भूमिका मांडाल. यातील सूत्रधार मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात पुरावे असूनही त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही.हिंदुत्व विरोधी लोक, संघटना यांना सोबत घेऊन पुढील लढाई लढली जाऊ शकते. आंबेडकरवाद्यांनीच आंबेडकरवाद्यांवर हल्ला केला, हा कोणत्या प्रकारचा तर्क आहे, हे समजणे अवघड आहे. ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जातीयवादी डोक्यातील कल्पना आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एल्गार प्रकरणात पुणे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात फेरफार केल्याचे मत नोंदविले आहे.घरात बॉम्ब ठेवणाºयांचीचौकशीदेखील नाही४डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासारख्या विवेकवादी व्यक्तींची गोळ््या घालून हत्या केली. त्यांना मारणाºयांच्या घरात जिवंत बॉम्ब मिळाले आहेत. अशा सनातन आणि शिवप्रतिष्ठानच्या प्रमुखांना साधे चौकशीसाठीही बोलवण्यात आले नाही. एका वगार्ला एक कायदा, दुसºयाला दुसरा कायदा, अशा प्रकारे सध्या काम सुरू असून हीच का लोकशाही?असा प्रश्न उपस्थित करीत हा संविधानाचा अपमान असल्याचे ढवळे यांनी पत्रात म्हटले आहे.१ एखाद्या गोष्टीला विरोध केला, तर त्यांना देशद्रोही ठरवले जात असून त्याचा अर्थ गोळ््या आणि तुरुंग, असा लावला जात आहे. आमच्या घरातून जी पत्र, इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त करण्यात आला ती पत्रे स्वत: पोलिसांनी लिहिलेली आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.२ सदर पत्र न्यायालयामार्फे त चंद्रशेखर रावण यांना देण्यात यावे, असा अर्ज ढवळे यांनी त्यांचे वकील सिद्धार्थ पाटील सोमवारी न्यायालयात केला. मात्र, यावर जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आक्षेप घेत संबंधित पत्र तपासण्याचे गरज असून त्यानंतर याबाबत भूमिका मांडू, असे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस