शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चाकणमध्ये १५ दिवसांसाठी ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 18:39 IST

पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही

चाकण : चाकण चौकातील वाहतूककोंडी नित्याचाच प्रश्न आहे. दिवाळीमुळे तर यामध्ये आणखी भर पडणार असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यामध्ये १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत चाकणमधून अवजड वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे सुरळीत वाहतुकीच्या चर्चेमुळे कोंडी झाली आहे.

पुणे - नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर या मार्गावरील चाकण चौकातील वाहतूककोंडी हा गेल्या काही वर्षांपासून अतिशय कळीचा मुद्दा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खासदार कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र, तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आगामी दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार कोल्हे यांनी चाकण वाहतूक विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेतली.

खासदार कोल्हे यांनी नागरिकांना दिवाळीच्या काळात वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी कंटेनरसह सर्व जड वाहनांची वाहतूक सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत बंद ठेवावी. तसेच तळेगाव चौकातील एसटी, पीएमटी व खासगी बसेसचे थांबे १०० मीटर पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चौकात उभ्या राहणाऱ्या रिक्षा व इतर प्रवासी वाहनांना चौकापासून १०० मीटर हद्दीपर्यंत पार्किंग करण्यास मज्जाव करावा. तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना दिल्या.

तळेगाव चौकाच्या चारही बाजूला रस्त्याला पडलेले खड्डे बुजविल्यास वाहनांना डावीकडे वळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, असे सहायक पोलीस आयुक्त कट्टे यांनी सुचवताच खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून चौकातील वळणावरचे खड्डे तत्काळ बुजविण्याचे निर्देश दिले.

प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

बैठकीतील चर्चेनुसार चाकणमधून ठरावीक वेळेला अवजड वाहनांना बंदी घातली तर त्याची पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. पण त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. बैठकीतील चर्चेनुसार सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत वाहने आली तर त्यांना थांबवायचे कोठे? पुण्यातून नाशिकला जाण्यासाठी चाकणचाच मार्ग आहे. तर दुसरीकडे मुंबईवरून येणाऱ्या वाहनांना वासुली फाटा रस्त्याचा पर्याय आहे. पण तो अरुंद असल्याने तेथे मोठे कंटेनर जाऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याकडेला जर ही वाहने थांबली तर वाहतूककोंडीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेroad transportरस्ते वाहतूक