शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

चाकणमध्ये १५ दिवसांसाठी ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 18:39 IST

पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही

चाकण : चाकण चौकातील वाहतूककोंडी नित्याचाच प्रश्न आहे. दिवाळीमुळे तर यामध्ये आणखी भर पडणार असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यामध्ये १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत चाकणमधून अवजड वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे सुरळीत वाहतुकीच्या चर्चेमुळे कोंडी झाली आहे.

पुणे - नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर या मार्गावरील चाकण चौकातील वाहतूककोंडी हा गेल्या काही वर्षांपासून अतिशय कळीचा मुद्दा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खासदार कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र, तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आगामी दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार कोल्हे यांनी चाकण वाहतूक विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेतली.

खासदार कोल्हे यांनी नागरिकांना दिवाळीच्या काळात वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी कंटेनरसह सर्व जड वाहनांची वाहतूक सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत बंद ठेवावी. तसेच तळेगाव चौकातील एसटी, पीएमटी व खासगी बसेसचे थांबे १०० मीटर पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चौकात उभ्या राहणाऱ्या रिक्षा व इतर प्रवासी वाहनांना चौकापासून १०० मीटर हद्दीपर्यंत पार्किंग करण्यास मज्जाव करावा. तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना दिल्या.

तळेगाव चौकाच्या चारही बाजूला रस्त्याला पडलेले खड्डे बुजविल्यास वाहनांना डावीकडे वळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, असे सहायक पोलीस आयुक्त कट्टे यांनी सुचवताच खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून चौकातील वळणावरचे खड्डे तत्काळ बुजविण्याचे निर्देश दिले.

प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

बैठकीतील चर्चेनुसार चाकणमधून ठरावीक वेळेला अवजड वाहनांना बंदी घातली तर त्याची पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. पण त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. बैठकीतील चर्चेनुसार सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत वाहने आली तर त्यांना थांबवायचे कोठे? पुण्यातून नाशिकला जाण्यासाठी चाकणचाच मार्ग आहे. तर दुसरीकडे मुंबईवरून येणाऱ्या वाहनांना वासुली फाटा रस्त्याचा पर्याय आहे. पण तो अरुंद असल्याने तेथे मोठे कंटेनर जाऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याकडेला जर ही वाहने थांबली तर वाहतूककोंडीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेroad transportरस्ते वाहतूक