शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

चाकणमध्ये १५ दिवसांसाठी ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 18:39 IST

पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही

चाकण : चाकण चौकातील वाहतूककोंडी नित्याचाच प्रश्न आहे. दिवाळीमुळे तर यामध्ये आणखी भर पडणार असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यामध्ये १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत चाकणमधून अवजड वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे सुरळीत वाहतुकीच्या चर्चेमुळे कोंडी झाली आहे.

पुणे - नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर या मार्गावरील चाकण चौकातील वाहतूककोंडी हा गेल्या काही वर्षांपासून अतिशय कळीचा मुद्दा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खासदार कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र, तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आगामी दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार कोल्हे यांनी चाकण वाहतूक विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेतली.

खासदार कोल्हे यांनी नागरिकांना दिवाळीच्या काळात वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी कंटेनरसह सर्व जड वाहनांची वाहतूक सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत बंद ठेवावी. तसेच तळेगाव चौकातील एसटी, पीएमटी व खासगी बसेसचे थांबे १०० मीटर पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चौकात उभ्या राहणाऱ्या रिक्षा व इतर प्रवासी वाहनांना चौकापासून १०० मीटर हद्दीपर्यंत पार्किंग करण्यास मज्जाव करावा. तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना दिल्या.

तळेगाव चौकाच्या चारही बाजूला रस्त्याला पडलेले खड्डे बुजविल्यास वाहनांना डावीकडे वळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, असे सहायक पोलीस आयुक्त कट्टे यांनी सुचवताच खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून चौकातील वळणावरचे खड्डे तत्काळ बुजविण्याचे निर्देश दिले.

प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

बैठकीतील चर्चेनुसार चाकणमधून ठरावीक वेळेला अवजड वाहनांना बंदी घातली तर त्याची पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. पण त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. बैठकीतील चर्चेनुसार सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत वाहने आली तर त्यांना थांबवायचे कोठे? पुण्यातून नाशिकला जाण्यासाठी चाकणचाच मार्ग आहे. तर दुसरीकडे मुंबईवरून येणाऱ्या वाहनांना वासुली फाटा रस्त्याचा पर्याय आहे. पण तो अरुंद असल्याने तेथे मोठे कंटेनर जाऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याकडेला जर ही वाहने थांबली तर वाहतूककोंडीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेroad transportरस्ते वाहतूक