शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भोर तालुक्यात अतिवृष्टीने भात, नाचणीसह पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:08 AM

भोर : भोर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील दरडी, झाडेझुडपे, दगड, माती, कोसळून लागवड केलेले भात, ...

भोर : भोर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील दरडी, झाडेझुडपे, दगड, माती, कोसळून लागवड केलेले भात, नाचणी ही पिके दगड-मातीने गाडून गेल्याने आणि पाण्याने वाहून जाऊन ताली पडून पिकांसह भात खाचरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भात पिकांवर अवलंबुन असलेली कुटुंब उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे शासनाने शेतीचे खाचरांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी अडचणीत सापडलेला शेतकरी करीत आहे.

भोर तालुक्यात तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातील निरा-देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील रायरी, कंकवाडी, धारांबे, धानवली, पऱ्हर बु., पऱ्हर खुर्द, गुढे, निवंगण माझेरी, शिरवली, कुडली बु,. कुडली खुर्द, दुर्गाडी, शिरगाव शिळींब, उबार्डेवाडी, अशिपी, कुंड, राजिवडी, साळुंगण, पांगारी, हिर्डोशी, वारवंड, कारुंगण, कोंढरी, म्हसर बु., म्हसर खु., करंजगाव यांसह वीसगाव खोरे, भाटघर धरण भागातील भुतोंडे खोरे या भागातील गावात डोंगरातील दरड माती मोठमोठी झाडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येऊन खाचरात आल्याने खाचरातील लावलेले भात पीक गाळाने गाडली आणि भात पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले. नाचणी पीक वाहून नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे खाचरांच्या भगदाड पडून मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाताची लागवडी केली नाही. त्या खाचरात दगड, माती, झाडे आल्यामुळे खाचरे लावण्यासारखी आवस्था राहिलेली नाही.

दरम्यान, तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची तर, १५०० हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाते. तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिकाशिवाय कोणतेही पीक होत नसून पावसाच्या लहरीपणावरच भात पीक अवलंबून आहे. म्हणजे पाऊस नाही पडला तरी भात पिकत नाही, पाऊस अधिक झाला तरीही भात पिकाचे नुकसान होते. या वेळी पावसामुळे तालुक्यात सुमारे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. यामुळे भाताच्या पिकावर अवलंबून असलेले संसार उघड्यावर येऊन उपासमार होईल, अशीच आवस्था आहे. पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान

पावसामुळे भात खाचरांच्या वाहून गेलेल्या दगडी ताली, खाचरात पडलेले दगड, गोटे, गाळ, माती, झाडेझुडपे बाहेर काढायला बैलजोडीचा उपयोग नसून जेसीबी किंवा मोठ्या यंत्राचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी होणार खर्च लाखो रुपयांच्या घरात आहे. सदरचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तर अनेकांची भात खाचरे दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेली आहेत. ती कधीच दुरुस्त होणार नाहीत. यामुळे आयुष्यभर ज्या शेतीवर संसार उभे राहिले ती खराब झाली आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागातील भुईमूग, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, भाजीपाला पिकांचेही पावसाने मोठे नुकसान झालेले आहे.

भात पीक नुकसान फोटो