शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भारनियमनाने सिंचन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:44 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे.

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे. सध्या चासकमान धरणातून डाव्या कालव्यामार्फत पाण्याचे आवर्तन सुरू आहे. परंतु विजेअभावी पिकांचे सिंचन करता येत नसल्याने ‘पाणी असूनही, घसा कोरडाच’ अशी दयनीय अवस्था येथील शेतकऱ्यांचीनिर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणाºया बळीराजाच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.शेलपिंपळगाव, बहुळ, कोयाळी-भानोबाची, मोहितेवाडी, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये कृषीपंपाच्या विजेचे मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. विशेष म्हणजे भारनियमन सोडून आलेली वीज वारंवार खंडित केली जात आहे. सलग होणाºया भारनियमनामुळे हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चालू रब्बी हंगामात उन्हाच्या काहिलींचा चटका जास्त क्षमतेने बसत असल्याने हंगामात पिकांच्या योग्य वाढीसाठी इतर हंगामाच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट पाणी द्यावे लागत आहे. त्यातच कांद्याच्या लागवडीही सुरू आहेत. मात्र विजेच्या समस्येमुळे मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही.वीज वितरण कंपनीने शेतकºयांच्या भावनांचा अंत न पाहता रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या विजेचे भारनियमन कमी करून किमान दिवसा अखंडित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सलग चौदा ते सोळा तासांहून अधिक वेळ नित्याचे भारनियमन केले जात आहे. त्याचा रब्बी हंगामातील शेतपिकांवर विपरीत परिणाम होतआहे, तर उपलब्ध विजेच्या वेळेतही वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे विद्युत पंप नादुरुस्त होऊन शेतकºयांचे आर्थिक नुकसानहोऊ लागले आहे.खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये दिवसाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेत रात्रीचे पीक सिंचन शेतकºयांना करावे लागत आहे.कोयाळी, मरकळ, मोहितेवाडी, साबळेवाडी, चिंचोशी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने येथील शेतकरी भीतीच्या छायेखाली शेतात जात आहेत.दररोजचे वाढते भारनियमन तसेच वारंवार होत असलेल्या खंडित विजेला आम्ही पूर्णत: कंटाळलो आहोत. गंभीर बनत चाललेला विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तत्काळ सोडविणे गरजेचे आहे. सध्या कांदा लागवडीसाठी विजेची जास्त गरज आहे. भारनियमन कमी करावे आणि तेही रात्रीचे करावे.- संतोष आवटे, माजी सरपंच, शेलगाव.