शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाने सिंचन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:44 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे.

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागात विजेचा पुरताच बोजवारा उडाला असून सोळा ते अठरा तासांचे भारनियमन केले जात आहे. सध्या चासकमान धरणातून डाव्या कालव्यामार्फत पाण्याचे आवर्तन सुरू आहे. परंतु विजेअभावी पिकांचे सिंचन करता येत नसल्याने ‘पाणी असूनही, घसा कोरडाच’ अशी दयनीय अवस्था येथील शेतकऱ्यांचीनिर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणाºया बळीराजाच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.शेलपिंपळगाव, बहुळ, कोयाळी-भानोबाची, मोहितेवाडी, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये कृषीपंपाच्या विजेचे मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. विशेष म्हणजे भारनियमन सोडून आलेली वीज वारंवार खंडित केली जात आहे. सलग होणाºया भारनियमनामुळे हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चालू रब्बी हंगामात उन्हाच्या काहिलींचा चटका जास्त क्षमतेने बसत असल्याने हंगामात पिकांच्या योग्य वाढीसाठी इतर हंगामाच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट पाणी द्यावे लागत आहे. त्यातच कांद्याच्या लागवडीही सुरू आहेत. मात्र विजेच्या समस्येमुळे मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही.वीज वितरण कंपनीने शेतकºयांच्या भावनांचा अंत न पाहता रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या विजेचे भारनियमन कमी करून किमान दिवसा अखंडित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सलग चौदा ते सोळा तासांहून अधिक वेळ नित्याचे भारनियमन केले जात आहे. त्याचा रब्बी हंगामातील शेतपिकांवर विपरीत परिणाम होतआहे, तर उपलब्ध विजेच्या वेळेतही वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे विद्युत पंप नादुरुस्त होऊन शेतकºयांचे आर्थिक नुकसानहोऊ लागले आहे.खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये दिवसाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेत रात्रीचे पीक सिंचन शेतकºयांना करावे लागत आहे.कोयाळी, मरकळ, मोहितेवाडी, साबळेवाडी, चिंचोशी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने येथील शेतकरी भीतीच्या छायेखाली शेतात जात आहेत.दररोजचे वाढते भारनियमन तसेच वारंवार होत असलेल्या खंडित विजेला आम्ही पूर्णत: कंटाळलो आहोत. गंभीर बनत चाललेला विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तत्काळ सोडविणे गरजेचे आहे. सध्या कांदा लागवडीसाठी विजेची जास्त गरज आहे. भारनियमन कमी करावे आणि तेही रात्रीचे करावे.- संतोष आवटे, माजी सरपंच, शेलगाव.