शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:56 IST

१३ तालुक्यांत सरासरीच्या ६८३.६ मि. मी. पाऊस; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

पुणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या आठवड्यापासून जोरदार कमबॅक केले असून खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, मुळशी व मावळ या तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या ६८३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने भाटघर, चासकमान, आसखेड, डिंभे धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात सोमवारी वाढ केली आहे. मात्र, जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर या तालुक्यांत पावसाने तुरळक हजेरी लावली. यामुळे येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात दर वर्षी सरासरी ८४५ मिलिमीटर पाऊस पडतो. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या वर्षी पावसाने दमदार आगमन केले. पहिल्या इनिंगमध्येच पावसाने जूनची सरासरी ओलांडली. विशेष म्हणजे, नेहमी अवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यांत सुरुवातीलाच आगमन केल्याने या वर्षी तेथील परिस्थिती बदलेल, अशी आशा होती; मात्र नंतर पावसाने ओढ दिली.जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांत सरासरी ४५० मिलिमीटर इतका पाऊस होतो. आतापर्यंत ६८३.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जून ते आॅक्टोबर महिन्यात ८२३.६ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होतो. आतापर्यंत या सरासरीच्या १३५ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक मावळ तालुक्यात १,९३१.३ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत १५८ इतका आहे. तर, त्याखालोखाल मुळशी तालुक्यात १,८३१.४६२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ११५ टक्के पाऊस झाला आहे. भोर १२३.१ टक्के, जुन्नर ९७.८ टक्के, खेड ७६.१ तर पुरंदर ५०.३ टक्के पाऊस झाला आहे.भामा-आसखेडमधून ३ हजार २८० क्युसेक्सने विसर्गआसखेड : थोडाकाळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा मुसळधार पडल्याने भामा आसखेड धरणातील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे; तसेच या धरणांमधून भामा नदीत ३ हजार २८० क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली. पावसाचा जोर वाढल्याने प्रवाह सकाळी ५५३ क्युसेक्सवरून १६५३ क्युसेक्स करण्यात आला, तर संततधार पावसाने सकाळपासूनच जोर धरल्याने प्रवाह वाढविण्यात आला आहे. त्यानंतर धरणात येणाºया प्रवाहाचा विचार करून विसर्ग जास्त करण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भारत बेंद्रे यांनी केले आहे.दौंड, बारामती, शिरूर या तालुक्यांना दमदार पावसाची आशाजिल्ह्यातील नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बारामती, इंदापूर, दौैंड व शिरूरमध्ये पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. बारामतीत ३४.४ टक्के पाऊस झाला आहे. इंदापूरला ४०, दौैंडला २६ तर शिरूरला २७.३ टक्के पाऊस झाला. त्यामुळे येथे दुष्काळसदृृश परिस्थिती निर्माण होत आहे. विहिरींचा पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांना चार व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी