शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:56 IST

१३ तालुक्यांत सरासरीच्या ६८३.६ मि. मी. पाऊस; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

पुणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या आठवड्यापासून जोरदार कमबॅक केले असून खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, मुळशी व मावळ या तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या ६८३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने भाटघर, चासकमान, आसखेड, डिंभे धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात सोमवारी वाढ केली आहे. मात्र, जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर या तालुक्यांत पावसाने तुरळक हजेरी लावली. यामुळे येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात दर वर्षी सरासरी ८४५ मिलिमीटर पाऊस पडतो. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या वर्षी पावसाने दमदार आगमन केले. पहिल्या इनिंगमध्येच पावसाने जूनची सरासरी ओलांडली. विशेष म्हणजे, नेहमी अवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यांत सुरुवातीलाच आगमन केल्याने या वर्षी तेथील परिस्थिती बदलेल, अशी आशा होती; मात्र नंतर पावसाने ओढ दिली.जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांत सरासरी ४५० मिलिमीटर इतका पाऊस होतो. आतापर्यंत ६८३.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जून ते आॅक्टोबर महिन्यात ८२३.६ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होतो. आतापर्यंत या सरासरीच्या १३५ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक मावळ तालुक्यात १,९३१.३ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत १५८ इतका आहे. तर, त्याखालोखाल मुळशी तालुक्यात १,८३१.४६२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ११५ टक्के पाऊस झाला आहे. भोर १२३.१ टक्के, जुन्नर ९७.८ टक्के, खेड ७६.१ तर पुरंदर ५०.३ टक्के पाऊस झाला आहे.भामा-आसखेडमधून ३ हजार २८० क्युसेक्सने विसर्गआसखेड : थोडाकाळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा मुसळधार पडल्याने भामा आसखेड धरणातील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे; तसेच या धरणांमधून भामा नदीत ३ हजार २८० क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली. पावसाचा जोर वाढल्याने प्रवाह सकाळी ५५३ क्युसेक्सवरून १६५३ क्युसेक्स करण्यात आला, तर संततधार पावसाने सकाळपासूनच जोर धरल्याने प्रवाह वाढविण्यात आला आहे. त्यानंतर धरणात येणाºया प्रवाहाचा विचार करून विसर्ग जास्त करण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भारत बेंद्रे यांनी केले आहे.दौंड, बारामती, शिरूर या तालुक्यांना दमदार पावसाची आशाजिल्ह्यातील नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बारामती, इंदापूर, दौैंड व शिरूरमध्ये पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. बारामतीत ३४.४ टक्के पाऊस झाला आहे. इंदापूरला ४०, दौैंडला २६ तर शिरूरला २७.३ टक्के पाऊस झाला. त्यामुळे येथे दुष्काळसदृृश परिस्थिती निर्माण होत आहे. विहिरींचा पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांना चार व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी