शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पावसात कचरा भिजू लागल्याने आरोग्याचा प्रश्न

By admin | Updated: June 22, 2015 04:34 IST

शहरामध्ये ठिकठिकाणी साठलेला कचरा पावसामुळे भिजू लागल्याने तो सडण्यास सुरुवात झाली आहे. कचऱ्याचा चिखल तयार होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी

पुणे : शहरामध्ये ठिकठिकाणी साठलेला कचरा पावसामुळे भिजू लागल्याने तो सडण्यास सुरुवात झाली आहे. कचऱ्याचा चिखल तयार होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट पूर्ण क्षमतेने कशी लावायची हा बिकट प्रश्न पालिकेला सोडवावा लागणार आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी येथील डेपोमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून कचरा टाकण्याची अट ग्रामस्थांनी टाकली आहे. कचरा भिजू लागल्याने अडचणी निर्माण होत आहेत. शहरामध्ये दररोज तेराशे ते चौदाशे टन कचरा तयार होतो, त्यापैकी पाचशे टन कचरा डेपोमध्ये टाकला जात आहे. साडेतीनशे ते चारशे टन कचरा शेतकरी खतासाठी घेत होते. तसेच उर्वरित कचरा बायोगॅस व इतर प्रकल्पांसाठी पाठविला जातो. पावसामुळे शेतकऱ्यांकडून कचरा घेतला जाणे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या कचऱ्याचा जटिल प्रश्न पुन्हा उभा राहणार आहे. शहरातील मध्यवस्तीसह उपनगरांमधील अनेक ठिकाणी कचरा उचलला गेला होता, त्यातच रविवारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने कचरा भिजून सगळीकडे पसरू लागला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात कचरा साठल्याने अचानक चिलटांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. पावसामुळे कचरा सडल्यास त्यातून आरोग्याचे आणखी गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.