शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:39 IST

आता आम्ही विकास करत आहोत तर पोटशूळ उठला आहे.

ठळक मुद्देसहकारी कारखान्यात सामान्य माणसांना सभासद करून दाखवा  

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील विरोधक वीस-पंचवीस वर्षे मंत्री पदावर होते त्यांनी का नवे रस्ते का केले नाहीत? का शेतीचा पाणी प्रश्न सोडवला नाही ? आता आम्ही विकास करत आहोत तर पोटशूळ उठला आहे. तुम्हाला तालुक्याच्या जनतेने आता घरी बसवले आहे. तुम्ही आमच्या कामाची चिंता करू नका. दिशाभूल करून तालुक्यातील जनतेला जातीपातीचे राजकारण करण्यासाठी भाग पाडू नका,  असा हल्लाबोल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.  

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याची पाणी पातळी वाढविणे. याकरिता १ कोटी ७३ लक्ष निधी जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाची सुरुवात बुधवार ( दि.१७ ) रोजी राजेंद्र तांबिले, संजय पाटील, भीमा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता ध. जी. कोंडेकर उपस्थित होते.

राज्यमंत्री भरणे म्हणाले, राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे आहे.हे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणारे आहे.सरकार म्हणजे नोटा छापण्याचा कारखाना नाही.आपण जे कर रुपी शासनाकडे निधी जमा करतो.तोच निधी विकास कामांना वापरता येतो यावर सरकार चालते हे लक्षात राहू द्या. त्यामुळे वीज बिल आपण भरणे गरजेचे आहे.व शेतकऱ्यांची वीज देखील अबाधित राहिली पाहिजे, हा सरकारचा उद्देश आहे अशी माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली._____________विरोधकांच्या पोटात पोटशूळ....इंदापूर तालुक्यात कोणतीही निवडणूक आली की जातीपातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करत असतात. परंतु मी कधीही जातिवाद केला नाही,  करणारही नाही. सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी मी विकासासाठी आणलेला निधी विरोधकांना देखवत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली....... 

सहकारी साखर कारखाने म्हणता मग सभासद करून का घेत नाही ?इंदापूर तालुक्यातील निरा - भिमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात आहे. सहकारी साखर कारखाने म्हणून मिरवतात. मात्र कोणालाही सभासद करून घेत नाही. नीरा-भीमा व कर्मयोगी साखर कारखान्यांमध्ये खुल्या पद्धतीने सभासदांना घेऊन दाखवा, असे आव्हान राज्यमंत्री भरणे यांनी विरोधकांना केले आहे.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकारministerमंत्री