शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार? पृथ्वीराज चव्हाण यांची उपहासात्मक टीका

By नम्रता फडणीस | Updated: February 15, 2024 01:44 IST

तुम्हाला काही ऑफर आली आहे का? त्यावर ' मला कोण ऑफर देणार? अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

पुणे : अशोक चव्हाण यांच्या बरोबर कोण जात आहे. अशा काही वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार? अशी उपहासात्मक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. ते एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते. 

अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याविषयी विचारले असता चव्हाण म्हणाले, अशोक रावांच्या प्रवेशाचा कार्यक्रम दिल्लीत जे.पी नड्डा यांच्यासमोर ठरला होता. तो झाला नाही. मग छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत ठरला होता. पण आरएसएसच्या लोकांनी तीव्र निषेध केला. तिथला शाह यांचा दौरा रद्द झाला. यामुळे प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत घ्यावा लागला. चव्हाणांच्या भाजपबरोबर वाटाघाटी बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. त्यांना उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटमध्ये महत्वाचे खाते पाहिजे होते. ते त्यांना मिळाले नाही. भाजपकडूनच विरोध झाला. त्यामुळे त्यांना एका अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेरच काढले आहे. त्यांना उमेदवारी लखलाभ आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

तुम्हाला काही ऑफर आली आहे का? त्यावर ' मला कोण ऑफर देणार? अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. कुणीही नेता गेला तरी नुकसान हे होतेच. किती मोठं नुकसान होईल ते सांगता येत नाही. लोकांना भाजपच्या कार्यशैलीबद्दल चीड आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल. परंतु कार्यकर्त्यांनी सोडून जाऊ नये असाच आमचा प्रयत्न असतो. पण त्यांची कोणती अपरिहार्यता होती, कुणाला काय पद दिले गेले? हे आम्हाला माहीत नाही. कुणाला राज्यसभेची उमेदवारी दिली जात आहे. कुणाला संस्थेची चौकशी करून त्यातून सुटका देण्याची आणि शांत झोप येऊ देण्याची भीती घातली जात आहे. कशासाठी कोण गेले? हे त्यांना विचारले पाहिजे असेही ते म्हणाले.

एकीकडे नेत्यांना भ्रष्टाचारी, ७० कोटींचा घोटाळा केला म्हणतात आणि नंतर त्यांना पक्षात सहभागी करून घेतात. नक्की त्यांची विचारधारा काय आहे? किती संधीसाधू राजकारण नरेंद्र मोदी आणि भाजप करीत आहेत. हे भारत आणि महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्यसभेसाठी जे सहा उमेदवार दिले आहेत. त्यातील तीन माजी काँग्रेसचेच आहेत. आमची सर्व आमदारांबरोबर बैठक चालू आहे. उद्या (दि. १५) सकाळी ९.३० वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा