गुऱ्हाळाची धुराडी पेटली

By Admin | Updated: June 13, 2015 22:34 IST2015-06-13T22:34:46+5:302015-06-13T22:34:46+5:30

मुळा-मुठा-भीमा या नद्यांच्या पात्रात बारमाही पाणी असल्यामुळे या भागात उसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

The haym of the hay was burnt | गुऱ्हाळाची धुराडी पेटली

गुऱ्हाळाची धुराडी पेटली


रांजणगाव सांडस : मुळा-मुठा-भीमा या नद्यांच्या पात्रात बारमाही पाणी असल्यामुळे या भागात उसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ज्या शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतीची नोंद साखर कारखान्याकडे नाही, त्याच्या ऊसतोडणीचा प्रश्न निर्माण होतो. परंतु, ग्रामीण भागात गुळाची गुऱ्हाळे सुरू झाल्यामुळे शेतकऱ्याच्या उसाचा प्रश्न सुटला असल्याचे बोलले जात आहे.
दौंड तालुक्यात या गुऱ्हाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, या गुऱ्हाळांना ऊस हा शिरूरच्या पूर्व भागातील गावांतून पुरवला जातो.
कारण, गूळ उत्पादक मालक शेतकऱ्याच्या उसाला प्रतिटन २२००-२३०० रुपये बाजारभाव देत असल्यामुळे या ऊस पट्ट्यामध्ये उसाचे ट्रेलर जाताना दिसतात. या भागात रसवंतिसाठी असणारा ऊस हा मुंबई, पुणे, राजस्थान या भागात जातो. या पट्ट्यातील उसाला असणारी गोडी वेगळीच असते.
ऊसतोडणीमुळे जनावरांना चारा म्हणून वाड्याचा वापर केला जातो. या भागात वर्षभर या गुऱ्हाळांच्या माध्यमातून ऊसतोडणीचा गूळ वर्षभर सुरू असतो. बागायती क्षेत्रात झालेली वाढ, वेगवेगळ्या साधनसुविधा उपलब्ध झाल्यामुळे ऊस हे पीक रोखठोक एकत्रित उत्पादन देणारेअसल्यामुळे शेतकरी हा ऊसशेतीकडे वळला आहे.

Web Title: The haym of the hay was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.