शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Pune: एकतर्फी प्रेमातून विवाहितेची छेड, आरोपीला तिसऱ्याच दिवशी शिक्षा!

By नम्रता फडणीस | Updated: August 8, 2023 17:04 IST

या प्रकरणात २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. ५ ऑगस्ट रोजी निकाल झाला....

पुणे : एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा पाठलाग करणे, तसेच फोनवर बोलून त्रास दिल्या प्रकरणाचा निकाल अवघ्या तीनच दिवसात लागला आहे. चंदननगर पोलिसांनी दोन दिवसात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी शिक्षा सुनावली. विनयभंग आणि धमकावणेच्या कलमानुसार ७ दिवसांची कैद आणि २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. ५ ऑगस्ट रोजी निकाल झाला.

अमोल नानाजी कांबळे (रा. थिटे वस्ती, खराडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे योगेश कदम यांनी काम पाहिले. पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामासाठी कोर्ट अंमलदार हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली. घटना घडलेल्या दिवशी म्हणजे २ ऑगस्ट रोजी त्याला तत्काळ अटक करण्यात आली. ३ ऑगस्ट रोजी त्याची रवानगी कारागृहात झाली. ४८ तासांच्या आत म्हणजे ४ ऑगस्ट रोजी दोषारोपपत्र दाखल झाले, तर ७२ तासांच्या आत म्हणजे ५ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी