शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Har Ghar Tiranga| मागणी तर वाढली, पण एवढे तिरंगे बनवणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:27 IST

जिल्ह्यातील २० लाखांपेक्षा अधिक घरांवर तिरंगा फडकणार....

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २० लाखांपेक्षा अधिक घरांवर तिरंगा फडकणार आहे. त्यामुळे २० टक्क्यांनी तिरंग्याची मागणी वाढली आहे. पण एवढे तिरंगे बनविणार कसे? असा प्रश्न उभा ठाकला आहे. कमी कालावधीत झेंड्याची मागणी जास्त असल्याने झेंडा बनवताना काही त्रुटींसह तो बाजारात दाखल झाला आहे. कटिंग व्यवस्थित नसलेले, माप अथवा शिवण योग्य नसणारे झेंडे सध्या बाजारात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यातील त्रुटी दूर करूनच तो फडकवावा, असे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने हर घर तिरंगा उपक्रमाची घोषणा करताना जनतेपर्यंत झेंडे पोहोचवण्याची जबाबदारी देखील घेतली होती. त्यानुसार पोस्टामार्फत देखील झेंडे वितरित केले जात होते. मात्र तेथील झेंड्यांमध्येदेखील त्रुटी असल्याने नागरिकांनी खासगी विक्रेत्यांकडे गर्दी केली आहे. दरवर्षी झेंडा बनवणाऱ्या कारखान्यांसह यंदा बचत गट आणि गरीब देशबांधवांनी अत्यंत कमी वेळेत झेंडे बनवले आहेत. वाढती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला असल्याने ग्राहकांनी देखील झेंडा विकत घेतल्यानंतर त्यातील त्रुटी दूर करूनच तो फडकवावा.

असा बनतो झेंडा..

या उपक्रमासाठी लागणारा झेंडा रोटो आणि सॅटिन कापडापासून बनवला जात आहे. कारखान्यांमध्ये लेजर मशिनवर कटिंग होऊन झेंडा बनवला जातो. मात्र, यंदा प्रचंड मागणी असल्याने तळागाळातील नागरिकांनी झेंडा बनवला आहे. अचानक मागणी वाढल्याने माल नसल्याने जेवढे शक्य आहे तेवढे झेंडे बनवून वितरित केले जात आहेत.

खादीचा झेंडा १०० ते ४०० रुपयांना..

वर्षानुवर्षे शासकीय नियमानुसार बनवले जाणारे खादीचे झेंडे बाजारात १०० ते ४०० रुपयांपर्यंत विकले जातात. २ बाय ३, ३ बाय ४.५ आणि ४ बाय ६ या तीन मुख्य आकारांमध्ये हे झेंडे असतात. यंदा सरकारने जी प्रत्येकाला परवानगी दिली आहे, तो झेंडा इतर साध्या कापडापासून बनवला जात आहे. इतर प्रिंटेड कपडे बनवणारे कारखानेच दरवर्षी झेंडा बनवतात. दिल्ली, गुजरात आणि दक्षिण भारतात याचे कारखाने आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड