शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘लक्ष्मी’ घडवणारे हात दारिद्रयाच्या अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 21:14 IST

प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे.

ठळक मुद्देबलुतेदारीमध्ये लक्ष्मी पूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान दिवसाला ७० ते ८० केरसुण्या बांधल्या जातातमातंग समाजाची व्यथा ; आंध्रप्रदेश, कर्नाटक, या राज्यातून स्थलांतरदिवाळी सण सोडला तर इतरवेळी महिला धुणीभांडी, पुरुष, लग्नसराईमध्ये वाजंत्र्याचे काम भविष्यात हा व्यवसाय टिकेल का नाही याची शंका

अमोल अवचिते पुणे:  दिवाळीला प्रत्येक मराठी माणसाच्या घरात केरसुणी लक्ष्मी म्हणून पुजण्याची महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आजदेखील घराघरात पाळली जाते. लोकांच्या घरामध्ये पुजली जाणारी लक्ष्मीची ज्या घरामध्ये निर्मिती होते ती घरं ऐन दिवाळीत आज देखील अंधारात असतात. त्यांच्या अठरा विश्व दारिद्रय हे पाचवीलाच पुजले आहे. कितीही कष्ट केले तरी मिळणारा मोबदला अल्पच. व्यापारी कवडीमोल भावाने केरसुणी विकत घेतात. यातून होणारी आर्थिक पिळवणूक उघड्या डोळांनी पाहावी लागते. महाराष्ट्रातील मातंग समाज झोपडपट्टीमधील मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहून 'लक्ष्मी' म्हणजेच केरसुणी बांधण्याचे काम  वर्षानुवर्षे करतोय.दिवाळी सणामध्येच केरसुनी बनवण्याचा व्यवसाय चालतो. या कालावधीमध्ये दिवसाला ७० ते ८० केरसुण्या बांधल्या जातात. तसे पाहता एकूणच १० ते १५ दिवसांच्या या दरम्यान सुमारे एक हजार ते दीड हजार केरसुण्या बांधून होतात. यातून मिळणारा मोबदला मात्र किरको़ळच असतो. केरसुणी २५ ते ३० रुपयांना विकली जाते. तर आधुनिक झाडूची किंमत १०० रुपयांच्या घरात आहे. केरसुणीच्या या किंमतीला देखील ग्राहकाकडून मोलभाव केला जातो. त्या विक्रीतुन गरज भागवेल इतकासुध्दा आर्थिक लाभ होत नाही.याच पैशातून मुलाबाळांना नवीन कपडे,, घरातलं आजारपण, लोकांची देणी, असा प्रपंच हाकला जातो. यात दिवाळी सण सोडला तर इतर दिवशी घरातील महिला धुणीभांडी, पुरुष, लग्नसराईमध्ये वाजंत्र्याचे काम करतात. तरीदेखील परिस्थतीशी दोन हात सुरुच असतात.       बलुतेदारीमध्ये लक्ष्मी पूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान आहे तर लक्ष्मीची निर्मिती करणारे कसबी हात मात्र दारिद्रयाच्या अंधारात अजूनही चाचपडत आहेत. प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे. केरसुणीला देवत्व देणाऱ्याकडून तिला जन्माला घालणाऱ्याला माणसांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावण्याची आस आहे. आमच्या कुटुंबाना सुखाचे दिवस ‘लक्ष्मी’ने दाखवावे आता हेच मनापासून वाटतं....................... शहरात रस्त्यावर अनेक ठिकाणी दक्षिण भारतीय केरसुणी विक्रेते दिवाळीमुळे दिसून येतात. हे नागरिक मूळचे आंध्रप्रदेशातील असून 'येरुकुला' आणि कुचीकर  या भटक्या जमातीचे आहेत. या समाजाचा केरसुणी बांधणे हा पिढीजात व्यवसाय आहे. आंध्रप्रदेश,  कर्नाटक, या राज्यातून स्थलांतर करतात. ..................................... शिंदीच्या झाडापासून केरसूनी बनवीली जाते. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. पुणे (जुन्नर),औरंगाबाद (सोयगाव) आणि आंध्रप्रदेशातून प्रामुख्याने मालाचा पुरवठा होतो. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे काँक्रिट जंगल वाढलं. परिणामी शिंदीच्या झाडांचे ही प्रमाण दिवसेंदिवस  कमी होत चालेले आहे. नवीन पिढी पिढीजात व्यवसाय करण्यास इच्छूक नाही. त्यामुळे कसबी कारागिरांची संख्या  कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय टिकेल का नाही याची शंका आहे.

 ............................. शिक्षण नसल्याने सरकारी कल्याणकारी योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती नसते. अंधश्रद्धा आणि आर्थिक कारणामुळे समाज नेहमीच विकासच्या मुख्य प्रवाहात मागे राहिला आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये जर या समाजाला टिकायचे असेल तर शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणायला हवे. संजय कोळेकर प्राध्यापक समाजशात्र विभाग ( सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणे)  ..................... रोजणदारीवर जाण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय कधीही चांगला. कष्ट भरपूर आहेत. त्या बदल्यात मोबदला कमी मिळतो तरी हा व्यवसाय करत आहे. अजूनही मराठी घरांमध्ये लक्ष्मीला मानसन्मान आहे.   गुलाब आदमने ( व्यावसायिक, मांजरी )

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी