शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अर्ध्या रस्त्यातून एसटी आणली परत; बारामतीत नऊ कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 19:25 IST

बस रस्त्यातून परत आणल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची ही अलीकडील काळात पहिलीच वेळ

बारामती : एसटी बस ठरलेल्या मार्गावर अर्ध्या रस्त्यातून परत आणणे आगाराच्या चालक वाहकांना महागात पडले आहे. प्रवाशांची गैरसोय केल्याच्या महिला प्रवाशांच्या तक्रारीवरुन राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील चार चालक, चार वाहक व नियंत्रक अशा नऊ जणांना येथील प्रभारी आगार व्यवस्थापक मनीषा इनामके यांनी काल निलंबित केले आहे. बस रस्त्यातून परत आणल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची ही अलीकडील काळात पहिलीच वेळ आहे.

एक नोव्हेंबर रोजी बारामती ते नीरा या ठिकाणी जाणारी एसटी बस वडगाव निंबाळकर या बस स्थानकातूनच परत आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. एसटी बस ठरलेल्या मार्गावर बस न नेता ती अर्ध्या रस्त्यातून परत आणल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या झालेल्या  गैरसोयीला जबाबदार धरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी काही प्रवाशी महिलांनी पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्याकडे मोबाईल वरून तक्रार दाखल केली होती. चार वाहक व चार चालकांनी बारामती मधून निघाल्यानंतर वडगाव निंबाळकर येथूनच या चार बसेस माघारी फिरवल्या आहेत.  त्यामुळे वडगाव निंबाळकर येथून नीरा बाजूकडे जाणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याची तक्रार करण्यात आली.  

याबाबतच्या तक्रारी थेट रमाकांत गायकवाड यांच्याकडे गेल्या. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्याने निलंबनाची कारवाई केली. अशा प्रकारे एसटीची पूर्ण फेरी न करता कोणालाही कल्पना न देता किंवा परवानगी न घेता अर्ध्या रस्त्यातून बस परत आणण्याचा प्रकार शिस्तभंग आहे. शिस्तभंगाचा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे याची दखल घेत निलंबनाची कारवाई केल्याचे रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीBus DriverबसचालकTransferबदलीCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक