शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

चासकमान धरणाची पातळी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:25 IST

५०.७० टक्के पाणी उपलब्ध : भविष्यात पाणीटंचाईची समस्या होणार गंभीर

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणात केवळ ५०.७० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे येत्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चासकमान धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलै रोजी सोडण्यात आले होते. परंतु, परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीनुसार सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेल्या खरीप हंगामाची पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच, १२ आॅक्टोबर रोजी पहिले आवर्तन बंद करण्यात येणार होते. परंतु, शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार पुन्हा २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कालव्याद्वारे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. खेड तालुक्यातील भीमा नदीतील पाणी संपुष्टात आल्यामुळे नदी अंतर्गत असलेल्या शेतकºयांची पिके धोक्यात आली होती. यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकºयांनी २९ तारखेला भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन देऊनही या निवेदनाची दखल न घेतल्याने शेतकºयांची उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ कार्यालयाला घेराव घातला होता. अखेर उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग कार्यालयाने या पत्राची दखल घेत त्याअनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाची दखल घेऊन प्राधान्याने बंधाºयात पाणी सोडले होते.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा फायदा खेडसह शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांनी आपल्या शेतात रब्बी हंगामातील घेण्यात आलेल्या कांदा, बटाटा, मका, गहू, आदी सह हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन हजारो हेक्टर पिकांना बहुतांशी प्रमाणात फायदा होणार आहे. परंतु, धरणांतर्गत असलेल्या शेतकºयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

परतीच्या पावसाने दडी मारल्याने चासकमान धरणातून शेतकºयांच्या मागणीनुसार खरीप हंगामाचे पहिले आवर्तन तब्बल ८९ दिवस सुरू ठेवल्याने ऐन आॅक्टोबरमध्ये पाण्याची पातळी खालावली. तसेच, दुसरे आवर्तन ४४ दिवसांपासून ५८५ क्युसेकने सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी खालावली यामुळे पाणलोट क्षेत्रातील डेहेणे, वाडा, वाळद, सुरकुंडी, आव्हाट परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असून, परिसरातील गावातील शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.अखेर धोम-बलकवडीचे पहिले आवर्तन सुटले1 भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील धोम-बलकवडी धरणाच्या विसगाव, चाळीसगाव खोºयातून गेलेल्या डाव्या कालव्याला पहिले आवर्तन सोडण्याच्या शेतकºयांच्या मागणीला अखेर आमदार संग्राम थोपटे व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. रविवार (दि. १६) कालव्याला ३२० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे रब्बीतील पिके जोमात येणार असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.2तालुक्याचा दक्षिण पट्टा हा दुर्गम व डोंगरी असल्याने दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जाते. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची टंचाई भासते. पिकांना पाण्याची टंचाई पाहता धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे पहिले आवर्तन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुटणे गरजेचे होते.3कालव्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याने त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. ते काम जलसंपदा विभागाने त्वरित पूर्ण केले आहे. पाणी दहा ते पंधरा दिवस उशिरा सुटले असले, तरी या पाण्यावर रब्बी जोमात येणार असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे. हे आवर्तन २८फेब्रुवारीपर्यंत देण्यात येणार आहे.धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे, तसेच पाणी सोडताना कालव्यांतर्गत असलेल्या शेतकºयांना विश्वासात न घेता पाणी सोडण्यात येत असल्याने चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे.मागील दोन आठवड्यांपूर्वी कालव्या अंतर्गत असलेल्या शेतकºयांच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे ‘धरण उशाशी, शेतकरी उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थीती यावर्षीही निर्माण होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरण