शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान धरणाची पातळी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:25 IST

५०.७० टक्के पाणी उपलब्ध : भविष्यात पाणीटंचाईची समस्या होणार गंभीर

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणात केवळ ५०.७० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे येत्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चासकमान धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलै रोजी सोडण्यात आले होते. परंतु, परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीनुसार सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेल्या खरीप हंगामाची पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच, १२ आॅक्टोबर रोजी पहिले आवर्तन बंद करण्यात येणार होते. परंतु, शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार पुन्हा २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कालव्याद्वारे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. खेड तालुक्यातील भीमा नदीतील पाणी संपुष्टात आल्यामुळे नदी अंतर्गत असलेल्या शेतकºयांची पिके धोक्यात आली होती. यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकºयांनी २९ तारखेला भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन देऊनही या निवेदनाची दखल न घेतल्याने शेतकºयांची उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ कार्यालयाला घेराव घातला होता. अखेर उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग कार्यालयाने या पत्राची दखल घेत त्याअनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाची दखल घेऊन प्राधान्याने बंधाºयात पाणी सोडले होते.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा फायदा खेडसह शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांनी आपल्या शेतात रब्बी हंगामातील घेण्यात आलेल्या कांदा, बटाटा, मका, गहू, आदी सह हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन हजारो हेक्टर पिकांना बहुतांशी प्रमाणात फायदा होणार आहे. परंतु, धरणांतर्गत असलेल्या शेतकºयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

परतीच्या पावसाने दडी मारल्याने चासकमान धरणातून शेतकºयांच्या मागणीनुसार खरीप हंगामाचे पहिले आवर्तन तब्बल ८९ दिवस सुरू ठेवल्याने ऐन आॅक्टोबरमध्ये पाण्याची पातळी खालावली. तसेच, दुसरे आवर्तन ४४ दिवसांपासून ५८५ क्युसेकने सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी खालावली यामुळे पाणलोट क्षेत्रातील डेहेणे, वाडा, वाळद, सुरकुंडी, आव्हाट परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असून, परिसरातील गावातील शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.अखेर धोम-बलकवडीचे पहिले आवर्तन सुटले1 भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील धोम-बलकवडी धरणाच्या विसगाव, चाळीसगाव खोºयातून गेलेल्या डाव्या कालव्याला पहिले आवर्तन सोडण्याच्या शेतकºयांच्या मागणीला अखेर आमदार संग्राम थोपटे व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. रविवार (दि. १६) कालव्याला ३२० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे रब्बीतील पिके जोमात येणार असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.2तालुक्याचा दक्षिण पट्टा हा दुर्गम व डोंगरी असल्याने दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जाते. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची टंचाई भासते. पिकांना पाण्याची टंचाई पाहता धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे पहिले आवर्तन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुटणे गरजेचे होते.3कालव्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याने त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. ते काम जलसंपदा विभागाने त्वरित पूर्ण केले आहे. पाणी दहा ते पंधरा दिवस उशिरा सुटले असले, तरी या पाण्यावर रब्बी जोमात येणार असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे. हे आवर्तन २८फेब्रुवारीपर्यंत देण्यात येणार आहे.धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे, तसेच पाणी सोडताना कालव्यांतर्गत असलेल्या शेतकºयांना विश्वासात न घेता पाणी सोडण्यात येत असल्याने चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे.मागील दोन आठवड्यांपूर्वी कालव्या अंतर्गत असलेल्या शेतकºयांच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे ‘धरण उशाशी, शेतकरी उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थीती यावर्षीही निर्माण होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरण