शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आमचं कुणीच ऐकेना आता तुम्ही तरी ऐका! आशा स्वयंसेविकांची अर्थमंत्र्यांकडे व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 19:59 IST

गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांची अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती...

सांगवी (पुणे) : आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी तसेच रस्त्यावर उतरून अनेकदा आंदोलने केली. मागण्या पूर्ण होण्यासाठी कित्येक वर्ष झगडतोय पण आमच कुणीच ऐकत नाही, लक्ष देत नाहीत. आता तुम्ही तरी आमचे ऐकून घ्या आणि मागण्या पूर्ण करा असे भावनिक होऊन गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केली.

राज्यभरात जवळपास ७० हजार आशा स्वयंसेविका आहेत. तर जवळपास साडेतीन हजार गटप्रवतर्क आहेत. आशा ८० प्रकारची कामे करत असतात. त्या कामाच्या आधारवर त्यांना मोबदला दिला जातो. या मोबदल्याचा दर जुना असून तो आता वाढवण्याची गरज असल्याचे मत आशा स्वयंसेविकांनी व्यक्त केले. बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदारपणे मिशन बारामती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी भाजपने बारामती दौरा सुरू केला असून यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर जबाबदारी दिली आहे. निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. 

दौऱ्यावर असताना निर्मला सीतारमण यांनी आशा स्वयंसेविकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आशा स्वयंसेविकांनी मानधनाच्या ऐवजी वेतन मिळावे, आशा सेविकांना अनेक कामं मिळावीत, अशी थेट मागणी सीतारामण यांच्याकडे केली. तसेच मानधन तत्वावर काम करताना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागत असल्याच्या व्यथा मांडल्या.

मोरगाव येथील श्री मयूरेश्वर मंदिरात दर्शनासाठी निर्मला सीतारामण आल्या होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीने त्यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडून अनेक वर्षांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी सीतारामण यांनी देखील आशा स्वयंसेविकांच्या भावना समजून घेत एका सेविकेला मिठी मारून लवकरच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :PuneपुणेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBaramatiबारामती