शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

उत्तम साहित्यानेच देश महासत्ता बनेल - प्रा. मिलिंद जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 03:31 IST

आपला देश केवळ उत्तम तंत्रज्ञानाने नाही तर उत्तम साहित्यानेच महासत्ता होणार आहे, असे प्रतिपादन मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

पुणे : आज पालक वाचत नाहीत म्हणून मुलेही वाचत नाहीत. आपली आजची मुले हीच पुढचे भविष्य आहेत. तेच हा देश महासत्ता बनविणार आहेत. त्यासाठी आज उत्तम साहित्याची निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. आपला देश केवळ उत्तम तंत्रज्ञानाने नाही तर उत्तम साहित्यानेच महासत्ता होणार आहे, असे प्रतिपादन मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेतर्फे प्रतिवर्षी श्रीनिवास रायते गुरुजी राज्यस्तरीय बालसाहित्यिक पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी पुण्याच्या बालसाहित्यिकाआश्लेषा महाजन यांना रविवारी सभारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.सन्मानपत्र, शाल, श्रीफल आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहायक संचालक सुनील शिनखेडे होते. याप्रसंगी व्यासपीठावर मधुसूदन रायते, मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्याध्यक्षा सायली जोशी आदी उपस्थित होते.कार्यक्रमात अमित कामतकर यांचा पुस्तक लिखाणाबद्दल, रामचंद्र धर्मसाले यांचा साने गुरुजी कथामालेवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आणि कल्याणराव शिंदे यांची विभागीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रकपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक सोलापूरचे अध्यक्ष मसाप जुळे पद्माकर कुलकर्णी यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे यांनी केले. श्रीकांत कुलकर्णी, मधुसूदन रायते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्वानंदी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या शेवटी गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.आज वडीलधारीही वाचत नाहीत...प्रा. जोशी म्हणाले, आज जीवनात खूप बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. एका प्रश्नाची अनेक उत्तरे येत आहेत. मुलांच्या हातात पुस्तकांऐवजी तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे वाचन होत नाही यासाठी शिक्षकांनी मुलांमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय आज घराघरातून वडीलधारी मंडळीही वाचत नाहीत.वडीलधारी मंडळीच जर वाचत नसतील मुले तर कशी वाचणार, असा साहजिकच प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वडीलधारी मंडळींनी वाचले पाहिजे. आश्लेषा महाजन यांनी आपल्या मनोगतात दर्जेदार बालसाहित्य निर्माण होण्याची गरज आहे. त्याचे लिखाण साधे आणि सोपे असावे. लहानांसाठी आज लिहिण्याची गरज आहे. तसेच त्याच्यासारखा दुसरा आनंद नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Puneपुणे