द्राक्ष, डाळिंब, गव्हाचे नुकसान

By Admin | Updated: March 2, 2015 01:17 IST2015-03-02T01:17:01+5:302015-03-02T01:17:01+5:30

शनिवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे पुणे जिल्हातील द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले.

Grapes, pomegranate, wheat loss | द्राक्ष, डाळिंब, गव्हाचे नुकसान

द्राक्ष, डाळिंब, गव्हाचे नुकसान

भोर / खोडद : शनिवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे पुणे जिल्हातील द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या गव्हाचे प्लॉट भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.
हरभरा, ज्वारी, आंबा, भाजीपाला व द्राक्ष या पिकांच्या एकूण २४१५०० हेक्टर क्षेत्रापैकी सरासरी १० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकांची प्रतवारी खराब होणार आहे. शनिवारी जिल्ह्यात एकूण २७.३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
ज्वारीच्या एकूण १३२००० हेक्टर क्षेत्रापैकी ७० टक्के पिकाची काढणी झाली होती तर, राहिलेल्या ३० टक्के पीक काढणी करून शेतात भिजत असल्याने ज्वारीची प्रतवारी खराब होणार आहे. ज्वारीचे १० टक्के नुकसान झाले आहे. गहू २५००० हेक्टरवर असून १० टक्के क्षेत्र काढणीच्या अवस्थेत आहे. पावसाने पिके जमिनीवर लोळल्याने काढणी करता येत नाही. त्याचेही १० टक्के नुकसान होणार आहे. हरभरा एकूण २४००० हेक्टरवर असून गव्हाप्रमाणेच परिपक्व होऊन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काढणी करताना सुमारे १० टक्के नुकसान होणार आहे.
द्राक्षाचे पीक बारामती, जुन्नर व इंदापूर तालुक्यात २५०० हेक्टरवर घेतले जाते़ ४०.५० हेक्टर क्षेत्रावरील तोडणी पूर्ण झाली असून, उर्वरित बागेत पावसाने बुरशीचा
प्रादुर्भाव होऊन फळाची गुणवत्ता कमी होणार आहे.
पाऊस थांबल्यावर उपाय योजना करता येईल. द्राक्षाचे २०.२६ टक्के नुकसान झाले आहे भाजीपाला ५१००० हेक्टरवर घेतला जातो. बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला. १०.२० टक्के नुकसान आहे. तर आंबा ७००० हेक्टरवर घेतला जातो. पावसाने मोहर गळून गेला असून, पाऊस थांबल्यावरच फवारणी करता येणार आहे. १० टक्के नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस (मि़मी़) बारामती ४ , पुरंदर २२, इंदापूर १, मुळशी ४०, आंबेगाव ३८, वेल्हे २८, जुन्नर ४२, भोर ३७, खेड ४३, दौड ९, शिरूर २०, मावळ २७ पाऊस झाला असून, एकूण २७.३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे़
पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा, आंबा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, आंबा व भाजीपाला पिकांवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे़ पावसाच्या पाण्यात भिजल्याने पिकांची प्रतवारी खराब होणार असू,न पाऊस उघडल्यावरच त्यावर उपाययोजना करता येईल, असे भोर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले . (वार्ताहर)

Web Title: Grapes, pomegranate, wheat loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.