शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पंधराव्या वित्त आयोगाच्या साव‌ळ्या गोंधळात ग्रामपंचायतींची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

राज्य शासनाने पथ दिव्याची (स्ट्रीट लाईट) बिले न भरल्याने गावे अंधारात आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च ...

राज्य शासनाने पथ दिव्याची (स्ट्रीट लाईट) बिले न भरल्याने गावे अंधारात आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करावा? यांच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीने विकास कामांचे आराखडे पाठवले आहेत. १५ वा वित्तआयोग निधी धनादेश अथवा आरटीजीएसशिवाय खर्च करता येत नाही. ही रक्कम फक्त पीएफएमएस प्रणालीव्दारेच खर्च करता येतो. पाणीपुरवठा किंवा पथदिवे बिले भरण्याचा आराखड्यात समावेश नसल्यामुळे बिले भरायला खर्च करू शकत नाहीत. मात्र, महावितरणने ग्रामपंचायतीकडे वीजबिले भरायला तगादा लावला आहे. यामुळे सरपंच व ग्रामसेवकांना गावाच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, २०१६ साली शासनाने ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची

बिले भरण्याचा शासन निर्णय घेतला होता. तेव्हापासून शासन ही बिले भरत आहे. मात्र, मागील चार-पाच वर्षांत बिले भरलेली नाहीत. अनेक गावांत स्ट्रीट लाइटसाठी मीटर नाहीत, भरमासाठी बिले येतात. याशिवाय थकलेल्या बिलांना महावितरण कंपनीने चक्रवाढ व्याज लावल्याने बिलांची रक्कम वाढली आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतीची वसुली थांबली आहे, तर पाणीपुरवठा योजनेचे ५०% टक्के वीजबिलांचे मिळणारे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे बहुतांशी गावातील नळपाणी पुरवठा योजनेची वीजबिले थकलेली आहेत. त्यातच बालसभा महिलासभा, गण प्रशिक्षण, ग्रामसभाआराखडा, प्लॅन प्लस याबाबींनी सरपंच व ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. मात्र, महावितरणकडून वीजबिलांबाबत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचा हिशेब दिलेला नाही किंवा जमा केलेल्याची माहिती दिली जात नसल्याचे ग्रामपंचायती सांगत आहेत

नळकनेक्शन, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी नळकनेक्शन, कोरोना आपत्ती खर्च बाधित अबंधित कधी ५० टक्के, तर कधी ६० टक्के, आपले सरकार सेवा केंद्र आगाऊ खर्च आणि आत्ता पथदिवे व नळपाणी पुरवठा योजना बिलांचा खर्च ग्रामपंचायतीने करावा आणि तो १५ व्या वित्त आयोगातून तालुक्यातील ८० ते ९० टक्के ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी आणी खर्च अधिक, अशी अवस्था आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी अशा पध्दतीने शासन खर्च करायला लावत असेल, तर गावांचा विकास कसा करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

--

चौकट

--

१५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने विकासकामांचे आराखडे तयार करून पाठवले आहेत. त्याला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, शासनाने पथदिव्याची व पाणीपुरवठा योजनेची थकीत बिले १५ व्या वित्त आयोगातून भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यासाठी विकासकामांचा आराखडा बदलावा लागणार असून तो अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच आहे.

ग्रामपंचायतीमधून पथदिव्याची बिले भरणे शक्य नाही. ही बिले शासनाने भरणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कामकाजात चाललेला अन्याय केंद्र व राज्य शासनाने थांबवावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भोर तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय गरुड व तालुक्यातील सरपंच यांनी दिला आहे.