शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Gram Panchayat Results in Pune | पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल, भाजपचाही वर्चस्वाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 09:11 IST

जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला...

पुणे : जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १३१ ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा केला आहे. भाजपनेही ६९ ठिकाणी झेंडा फडकवल्याचे छातीठोकपणे सांगितले, तर काँग्रेसने २६ ठिकाणी यश मिळवले आहे.

जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुका अधिकृतरीत्या कोणत्याही पक्ष चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत, तरीही सर्वच पक्षांनी आपलेच वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा केला आहे. तरीही या मतमोजणीत राष्ट्रवादीचाच बोलबाला राहिल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात २२१ पैकी ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मतमोजणीत भोर आणि आंबेगाव तालुक्यात दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामुळे नियमांनुसार ईश्वर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित केल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी (दि. २२) विजयी झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात भोर वगळता अन्य ११ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणुका लढविल्या आहेत. शिवसेना आणि शिंदे गट हे समोरासमोर उभे ठाकले होते. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा जनतेतून थेट सरपंच निवडून आणण्याची पद्धत अमलात आल्याने ही निवडणूक चुरशीची ठरल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदविले.

जिल्ह्यातील १३१ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले असून, त्याच ठिकाणी ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने जिल्ह्यात पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, भाजपने १२३ सरपंचपदांच्या जागा लढविल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. पहिल्याच प्रयत्नात ग्रामपंचायत निवडणुकीत मुसंडी मारण्यात यश आल्याचा दावा भाजपने केला आहे. काँग्रेसने २६ ठिकाणी ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या. काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांच्या पाठिंब्यावर ग्रामंपचायतीत संमिश्र सत्ता आली आहे.

 

जनतेने आमच्या पक्षावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. पक्षाचे वर्चस्व कायम राहिले आहे. जनतेच्या सेवेस आम्ही कटिबद्ध आहोत.

- प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

 

जिल्ह्यात प्रथमच भाजपने समन्वयकांची नियुक्ती करून निवडणुका पूर्ण ताकदीने लढविल्या. त्यावर जनतेनेही विश्वास दाखविला. त्यामुळे ६७ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. ६९ ग्रामपंचायती पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. एकूण १२३ जागांवर आम्ही निवडणुका लढविल्या.

- गणेश भेगडे, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा