शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राज्यपालांनी केलेले 'ते' वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी; रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:56 IST

संपूर्ण महाराष्ट्रातून कोश्यारी यांच्यावर शिवप्रेमी, राजकीय नेते यांच्याकडून टीका होऊ लागली आहे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कोश्यारी यांच्यावर शिवप्रेमी, राजकीय नेते यांच्याकडून टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला अयोग्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीसुद्धा ''रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले आपले वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा'' असे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. 

''छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आणि फक्त राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि राजपिता शहाजीराजे भोसले आहेत हे लक्षात घ्यावे. त्यामुळे रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले आपले वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा असं त्या म्हणाल्या आहेत. तर  राज्यपाल कोश्यारी आपण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून सगळीकडे मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत असताना हा महाराष्ट्र ज्यांच्या नावामुळे संपूर्ण जगभरात ओळखला जातो. त्यांच्याबद्दल बोलताना किमान अभ्यास करून बोलायला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.'' 

जिजाऊ आणि शहाजीराजे शिवाजी महाराजांचे गुरु 

 राजमाता जिजाऊ  - शिवबांना "छत्रपती शिवाजी महाराज" म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता आहेत. आणि राजपिता शहाजी राजे हे शिवबांच्या मनात "स्वराज्य" ही संकल्पना रुजविणारे कर्तुत्ववान पिता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

नाना पटोले यांचीही टीका 

''रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते. काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करुन रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कतृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे परंतु रामदास स्वामींना महाराजांचा गुरु दाखवून बुद्धीभेद केला जात आहे. भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.'' 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस