शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला देशात दंगली घडवायच्यात; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 08:00 IST

हे सरकार किती स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आहे ते लवकरच उघड करेन.

पुणे: आगामी निवडणुका टाळण्यासाठी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण करता यावी, यासाठी सरकारला देशभरात दंगली घडवायच्या आहेत. किंबहुना तोच सरकारचा प्रमुख अजेंडा आहे, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या सातव्या पंचवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. देशातील विविध समूहांमध्ये अस्वस्थता पसरविण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. दंगल माजविणे हाच सरकारचा अजेंडा आहे. कारण दंगलीनंतर व्यवस्था कोलमडल्याच्या नावाखाली आणीबाणी लावून निवडणुका घेता येणार नाहीत, असे वातावरण तयार केले जाईल. मात्र, सरकारला दंगल करण्याची, जाळपोळ करण्याची संधीच मिळू देऊ नका. सत्ता हाती घेण्याचे ध्येय ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्यावर होत असलेल्या नक्षलवादाच्या आरोपांबाबत येत्या १३ जूनला मुंबईत उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात आतापर्यंत हिंदू-मुस्लिम वाद भडकविण्यात आला. आता आरक्षणाच्या विरोधात रान पेटविण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते आरक्षणाविरोधात मोर्चे काढत आहेत, यज्ञ करत आहेत. सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही. कदाचित या प्रश्नावर दंगल माजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताच्या संसदेत बहुमत नसल्याने वातावरण तापविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, या प्रकारांकडे दुर्लक्ष करून सरकारला दंगल घडविण्याची संधी मिळू देऊ नका. आगामी निवडणुकीत सत्ता हाती घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार किती स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आहे, याबद्दल एक गौप्यस्फोट करणार असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र