शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करणे, ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. परीक्षा ...

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करणे, ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. परीक्षा वेळेवर न होणे, तसेच रखडलेल्या नियुक्त्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने योग्य पावले उचलून एमएससीबाबत नियोजन करावे. कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. आता तिसरी लाट ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची असेल, असा इशारा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे. अनास्थेचा बळी ठरलेल्या सरकारने आता तरी वेळेवर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही या वेळी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीतून स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरून दिसून येत आहे.

विद्यार्थिनी संध्या सोनवणे म्हणाली, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे. मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वेळेवर परीक्षा न घेतल्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे, यामुळे येणाऱ्या काळात अशा घटना उद्भवू नये, यासाठी एमपीएससीने यूपीएससीच्या पावलावर पाऊल ठेवून वेळेवर आणि नियोजन करून परीक्षा घेतल्या पाहिजेत.'

''२०१९ ला जाहिरात आलेली गट ब ची परीक्षा ५- ६ वेळेस पुढे ढकलण्यात आली. ती अजूनही झालेली नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेली वय आणि कर्जाचा डोंगर ह्यामुळे विद्यार्थी मेटाकुटीला आलेले आहेत. संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख, रखडलेल्या सर्व परीक्षांचे आणि नवीन जाहिरातीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी राम लेंडेवाड याने केली आहे.''

''सरकारकडून एमपीएससीसाठी वेळेवर मागणीपत्र प्राप्त होत नाही. त्यामुळे परीक्षाही वेळेवर होत नाहीत. तसेच एमपीएससीची पाच सदस्य, एक अध्यक्ष अशी रचना असताना गेली तीन वर्षे फक्त एक अध्यक्ष व एक सदस्य मिळून कारभार पाहत आहेत. त्यामुळे ना निकाल वेळेवर लागतो ना परीक्षा वेळेवर होतात. म्हणून हा सरकारी अनास्थेचा बळी आहे. सरकारने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,” असे विद्यार्थी नीलेश निंबाळकर याने सांगितले आहे.

स्टुडंट हेल्पिंग हँड अध्यक्ष कुलदीप आंबेकर म्हणाले, आत्महत्या नसून एक प्रकारे व्यवस्थेकडून झालेला खूनच आहे. असे सत्र गेल्या तीन वर्षांपासून सतत चालूच आहे. कोणतेही शासन असो - आधीचे किंवा आत्ताचे, वर्षानुवर्षे फटका मात्र विद्यार्थ्यांनाच बसत आला आहे. परीक्षा पास झाल्यावर देखील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जुन्या मंडळींकडून अपेक्षा ठेवणे कठीण आहे. पण राज्याच्या युवा नेतृत्वाने पक्ष, संघटना या सर्वांपलीकडे जाऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अन्यथा असे अनेक स्वप्नील आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत, हे लक्षात त्यांनी घ्यावे.