शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

शासनाकडून स्कॉलर विद्यार्थ्यांची थट्टा; परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:46 IST

प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करण्यासाठी शासनाकडून महिना १०० रूपये इतकी तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे.

- दीपक जाधवपुणे : प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करण्यासाठी शासनाकडून महिना १०० रूपये इतकी तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आलेली नाही, त्यामुळे या परीक्षेकडेच विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली असून परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत खाली घसरली आहे.महाराष्टÑ शासनाने गुणवंत विद्यार्थ्यांना गरीब परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी १९५४ पासून ४ वी व ७ वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा घेऊन दरमहा शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा घेतली जाते.दोन वर्षांपूर्वी या परीक्षांच्या इयत्तेमध्ये बदल करण्यात आला असून आता इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) व इयत्ता ८ वी (पूर्व माध्यमिक) च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील (२०१७-१८) शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडत आहे. यंदा ५ वी व ८ वी या दोन्ही इयत्तांसाठी मिळून केवळ ७ लाख ८९ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. शिष्यवृत्ती देणाºया विद्यार्थ्यांची २००९ मध्ये २१ लाखांवर जाऊन पोहोचलेली संख्या कमी-कमी होत यंदाच्या वर्षी (२०१७-१८) अवघ्या ७ लाख ७९ हजारांवर जाऊन पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन वह्यांसाठीच खर्च होतात १०० रुपयेविद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे, साध्या २ वह्यांसाठी एकावेळ शंभर रुपये खर्ची पडतात. बाकी शाळेची फी, गणवेश दप्तर, वह्या-पुस्तके, स्कूल बस हा खर्च हजारांमध्ये जातो. मात्र शासनाकडून अजूनही केवळ १०० रुपयेच शिष्यवृत्ती दिली जाते आहे. त्यामुळे ही शिष्यवृत्ती मिळविण्याचा आटापिटा करण्याची आवश्यकता विद्यार्थी व पालकांना वाटेनाशी झाली आहे.शिष्यवृत्तीपेक्षा कोचिंग अन् पुस्तकांसाठी जास्त खर्चशिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यास प्रतिमहा १०० रुपये असे १० महिन्यांचे हजार रुपये मिळतात. मात्र पाल्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वह्या-पुस्तके, गाइड व कोचिंगसाठीच हजारो रुपये खर्च होतात. त्यामुळे या शिष्यवृत्तीचा असाही विद्यार्थ्यांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी आर्थिक मदत देणे या शिष्यवृत्तीच्या मूळ हेतूच बाजूला पडला आहे.तुकाराम बर्गे, पालकखर्च हजारांनी वाढला, पण शिष्यवृत्ती जैसे थेअगदी शिशू गटातील विद्यार्थ्यांच्या शाळेची फी, गणवेश दप्तर, वह्या-पुस्तके, स्कूल बस यांचा खर्चही आज हजारांमध्ये जातो आहे. त्याचवेळी शासनाकडून मात्र ५ वी व ८ वीमध्ये लाखो विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादीत येणाºया स्कॉलर विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षांपासून केवळ महिना १०० रुपये इतकीच शिष्यवृत्ती दिली जाते आहे. त्यामुळे या शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्यासाठी आता पालक उत्सुक दिसून येत नाहीत. - प्रिया पवार, पालक

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी