शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

शासकीय यंत्रणा-व्यावसायिक यांच्यात होणार कुरघोड्या ?

By admin | Updated: March 3, 2016 01:35 IST

तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. शासकीय यंत्रणा विरुद्ध व्यावसायिक

इंदापूर : तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. शासकीय यंत्रणा विरुद्ध व्यावसायिक यांच्यात कुरघोड्या होण्याची शक्यता बळावली आहे. या दोन्ही बाजूंचा निपक्षपाती तपास होणे गरजेचे बनले आहे. उजनी धरण व नीरा-भीमा नद्यांचे खोरे, पाणलोट क्षेत्र हा इंदापूर तालुक्यातील सर्व भाग ‘काळ्या सोन्याची खाण’ मानला जातो. शासनाला महसूल व व्यवसायिकांना वाळू हवी आहे. अन् या दोन्ही गरजेच्या सांधीमधला शासकीय प्रवृत्तीला मधला ‘मलिदा’ हवा आहे. एकीकडे मलिदा ही खायचा आणि दुसरीकडे कारवाईही सहन करायची, या तोंड दाबून बुक्क्या मारण्याच्या प्रकाराचा ज्या वेळी कडेलोट झाला. त्या वेळी निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर यांच्या नेतृत्वाखाली वाळू व्यावसायिक एकत्र झाले. फेब्रुवारी महिन्याच्या आठ तारखेला पुणे व सोलापूर जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण रस्त्याच्या डोंगराई ढाब्यानजीक तब्बल दीड तासांचा रास्ता रोको केला. तहसील कार्यालयात हंगामा केला. या गोष्टीला सतरा दिवस उलटल्यानंतर गुरुवारी (दि. २५) तहसीलदारांचा शासकीय वाहनचालक अनिल जयसिंग काळे (वय ५५, रा. पाटील बंगला परिसर, इंदापूर) यांचा डोंगराई ढाबा सर्कलजवळ अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सचिन पांडुरंग माने, नवनाथ किसन एकाड (दोघे रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तहसीलदार सूर्यकांत येरले यांना गुन्हा नोंदवतेवेळी धमकी देऊन शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरून, दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ एकाडचा भाऊ शिवाजी एकाड यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. तिघेही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत सखोल चौकशी करताना, काही बाबीही प्रकाशात आल्या आहेत. काळे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी फोन करून काळे यांना बोलावून घेतले. सचिन माने या आरोपीने काळे यांच्या दुचाकीला ठोस दिली, असा उल्लेख केला आहे. मुळात काळे यांना त्या दिवशी सुट्टी नव्हती, ते नोकरीवर असताना, त्यांनी दुचाकीवरून येणे चुकीचे आहे. जर, आरोपींनी फोन केला व ते निर्धास्तपणे आरोपींकडे आले. याचा अर्थ त्यांचे आधीपासूनचे लागेबांधे असणार आहेत. आरोपींना त्यांना जिवे मारायचे असते, तर त्यांनी स्वत:चे वाहन वापरलेच नसते. परहस्ते ते असे कृत्य करू शकले असते.