शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

शासकीय यंत्रणा-व्यावसायिक यांच्यात होणार कुरघोड्या ?

By admin | Updated: March 3, 2016 01:35 IST

तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. शासकीय यंत्रणा विरुद्ध व्यावसायिक

इंदापूर : तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. शासकीय यंत्रणा विरुद्ध व्यावसायिक यांच्यात कुरघोड्या होण्याची शक्यता बळावली आहे. या दोन्ही बाजूंचा निपक्षपाती तपास होणे गरजेचे बनले आहे. उजनी धरण व नीरा-भीमा नद्यांचे खोरे, पाणलोट क्षेत्र हा इंदापूर तालुक्यातील सर्व भाग ‘काळ्या सोन्याची खाण’ मानला जातो. शासनाला महसूल व व्यवसायिकांना वाळू हवी आहे. अन् या दोन्ही गरजेच्या सांधीमधला शासकीय प्रवृत्तीला मधला ‘मलिदा’ हवा आहे. एकीकडे मलिदा ही खायचा आणि दुसरीकडे कारवाईही सहन करायची, या तोंड दाबून बुक्क्या मारण्याच्या प्रकाराचा ज्या वेळी कडेलोट झाला. त्या वेळी निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर यांच्या नेतृत्वाखाली वाळू व्यावसायिक एकत्र झाले. फेब्रुवारी महिन्याच्या आठ तारखेला पुणे व सोलापूर जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण रस्त्याच्या डोंगराई ढाब्यानजीक तब्बल दीड तासांचा रास्ता रोको केला. तहसील कार्यालयात हंगामा केला. या गोष्टीला सतरा दिवस उलटल्यानंतर गुरुवारी (दि. २५) तहसीलदारांचा शासकीय वाहनचालक अनिल जयसिंग काळे (वय ५५, रा. पाटील बंगला परिसर, इंदापूर) यांचा डोंगराई ढाबा सर्कलजवळ अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सचिन पांडुरंग माने, नवनाथ किसन एकाड (दोघे रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तहसीलदार सूर्यकांत येरले यांना गुन्हा नोंदवतेवेळी धमकी देऊन शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरून, दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ एकाडचा भाऊ शिवाजी एकाड यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. तिघेही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत सखोल चौकशी करताना, काही बाबीही प्रकाशात आल्या आहेत. काळे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी फोन करून काळे यांना बोलावून घेतले. सचिन माने या आरोपीने काळे यांच्या दुचाकीला ठोस दिली, असा उल्लेख केला आहे. मुळात काळे यांना त्या दिवशी सुट्टी नव्हती, ते नोकरीवर असताना, त्यांनी दुचाकीवरून येणे चुकीचे आहे. जर, आरोपींनी फोन केला व ते निर्धास्तपणे आरोपींकडे आले. याचा अर्थ त्यांचे आधीपासूनचे लागेबांधे असणार आहेत. आरोपींना त्यांना जिवे मारायचे असते, तर त्यांनी स्वत:चे वाहन वापरलेच नसते. परहस्ते ते असे कृत्य करू शकले असते.