शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

"सरकार म्हणजे लबाडाघरचं जेवण"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:11 IST

राज्यातील आणि देशातील सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

शेटफळगढे : राज्यातील आणि देशातील सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. भाजपा सरकारच्या आश्वासनांना पुन्हा फसू नका आपल्याकडे एक म्हण आहे, ‘लबाडाघरचं जेवण जेवल्याशिवाय काही खरं नाही,’ तसं हे सरकार आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.पोंधवडी (ता. इंदापूर) येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा झाली त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी मंचावर आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, अभिजित तांबिले, हनुमंत बंडगर, यशवंत माने, सरपंच राणी बंडगर, उपसरपच मीरा भोसले, सदस्य सचिता बंडगर, बाळासाहेब खारतोडे, तुळशीराम खारतोडे, तुकाराम बंडगर, महेश शेंडगे आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, की हे सरकार नुसते आश्वासन देते. पूर्तता करत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणाले, दिली का कर्जमाफी, हे सरकार फक्त थापा मारत आहे. आज साखर उचलली जात नाही. त्यामुळे साखर कारखानदारीसह शेतकरी अडचणीत आहे.एकीकडे हजारो कोटी कर्ज घेऊन उद्योगपती फरार झाले आहेत. शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना त्यांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र अशा वेळी दुधाला दिले जाणारे अनुदान बंद केले. पाण्याचे नियोजन नाही त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांची वीजच कमी केली. त्यावर मी आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांना यांना भेटून दिवसा आठ तास व रात्री दहा तास वीज देण्याचे नियोजन केले.आपल्या भागात एकही नवीन प्रकल्प या सरकारच्या काळात आला नाही. उलट आपल्या येथे असलेला कागद प्रकल्प अडचणीतून मार्ग काढत आहे. भाजपाच्या सरकारच्या काळात समाजातील कोणताच घटक समाधानी नाही. त्याचबरोबर राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत यांच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवले नाहीत. केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच करत नाहीत. आता धनगर समाजालाही पुन्हा वेगळे सांगून फसविण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे यांच्या खोट्या आमिषाला बळी न पडता येणाºया निवडणुकात सरकार उलथून पाडा, असेही आवाहन पवार यांनी यावेळी केले. माजी सरपंच नानासाहेब बंडगर यांनी प्रास्ताविक केले.>इंदापूरकरांना जॅकेटचा लय नाद...दरम्यान, या कार्यक्रमाला पोंधवडीचे माजी सरपंच नानासाहेब बंडगर यांनी जॅकेट घातले होते. यावर अजित पवार यांनी बोलताना इंदापूरकरांना जॅकेटचा लयच नाद आहे, असे म्हणताच हशा पिकला. या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढण्यास पवार विसरले नाहीत, अशी चर्चा कार्यक्रमानंतर रंगली होती. त्यामुळे यंदा हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांची जुगलबंदी रंगणार, असे चित्र स्पष्ट झाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार