शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

प्राचार्य भरतीवरील बंदी शासनाने उठवली : महाविद्यालयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 21:00 IST

राज्य शासनाने ९ जून २०१७ पासून महाविद्यालयातील प्राचार्य पदे भरण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

ठळक मुद्देरिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा, सध्या राज्यभरात प्राचार्यांच्या २६१ जागा रिक्तआता प्राध्यापक भरतीची बंदी कधी उठणार याकडे सगळयांचे लक्ष महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार

पुणे : महाविद्यालयांमधील प्राचार्य पदांची भरती करण्यावर असलेले निर्बंध उठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण संचालक धनराज माने यांनी सर्व विद्यापीठांचे कुलसचिव व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत. राज्य शासनाने ९ जून २०१७ पासून महाविद्यालयातील प्राचार्य पदे भरण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सध्या राज्यभरात प्राचार्यांच्या २६१ जागा रिक्त आहेत तसेच सेवानिवृत्तीमुळे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभुमीवर रिक्त असलेल्या व भविष्यात रिक्त होणाऱ्या सर्व जागांवर प्राचार्यांची नियुक्ती करण्याचा मार्ग शासनाकडून मोकळा करण्यात आला आहे.महाविद्यालयामधील प्राचार्य हे एकाकी पद आहे. प्राचार्य हे कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत असतात. महाविद्यालयातील दैनंदिन प्रशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजाच्या दृष्टीने तसेच राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती प्रमाणन मिळण्याकरिता नियमित प्राचार्य कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राचार्य पदाचा प्रभारी कार्यभार हा ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभुमीवर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त असलेली प्राचार्यांची पदे भरण्यासाठी शासनाकडून मान्यता देत असल्याचे परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे. शासनाकडून प्राचार्य पदाच्या भरतीला मान्यता देण्यात आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. उपसंचालक कार्यालयाकडून प्राचार्य भरतीसाठी ना हरकत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सहायक प्राध्यापक भरतीकडे लक्षराज्यातील प्राचार्य भरतीवरील बंदी राज्य शासनाने उठविली असली तरी सहायक प्राध्यापक भरतीवर असलेले निर्बंध अद्याप कायम आहेत. प्राध्यापक भरतीवर असलेल्या बंदीमुळे राज्यातील सहायक प्राध्यापक पदाच्या शेकडो जागा रिक्त आहेत. त्याचा मोठा परिणाम महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर होत आहे. प्राचार्य भरतीची बंदी उठविल्यानंतर आता प्राध्यापक भरतीची बंदी कधी उठणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे........... ‘‘महाविद्यालयांमध्ये प्राचार्य या संवर्गाचे पद हे एकाकी पद आहे, तसेच त्यांच्यावर कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे. त्यामुळे महाविद्यालयात रिक्त असलेली प्राचार्यांची पदे भरण्याची प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे.’’- धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण विभाग 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापक