शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

प्राचार्य भरतीवरील बंदी शासनाने उठवली : महाविद्यालयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 21:00 IST

राज्य शासनाने ९ जून २०१७ पासून महाविद्यालयातील प्राचार्य पदे भरण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

ठळक मुद्देरिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा, सध्या राज्यभरात प्राचार्यांच्या २६१ जागा रिक्तआता प्राध्यापक भरतीची बंदी कधी उठणार याकडे सगळयांचे लक्ष महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार

पुणे : महाविद्यालयांमधील प्राचार्य पदांची भरती करण्यावर असलेले निर्बंध उठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण संचालक धनराज माने यांनी सर्व विद्यापीठांचे कुलसचिव व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत. राज्य शासनाने ९ जून २०१७ पासून महाविद्यालयातील प्राचार्य पदे भरण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सध्या राज्यभरात प्राचार्यांच्या २६१ जागा रिक्त आहेत तसेच सेवानिवृत्तीमुळे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभुमीवर रिक्त असलेल्या व भविष्यात रिक्त होणाऱ्या सर्व जागांवर प्राचार्यांची नियुक्ती करण्याचा मार्ग शासनाकडून मोकळा करण्यात आला आहे.महाविद्यालयामधील प्राचार्य हे एकाकी पद आहे. प्राचार्य हे कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत असतात. महाविद्यालयातील दैनंदिन प्रशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजाच्या दृष्टीने तसेच राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती प्रमाणन मिळण्याकरिता नियमित प्राचार्य कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राचार्य पदाचा प्रभारी कार्यभार हा ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभुमीवर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त असलेली प्राचार्यांची पदे भरण्यासाठी शासनाकडून मान्यता देत असल्याचे परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे. शासनाकडून प्राचार्य पदाच्या भरतीला मान्यता देण्यात आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. उपसंचालक कार्यालयाकडून प्राचार्य भरतीसाठी ना हरकत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सहायक प्राध्यापक भरतीकडे लक्षराज्यातील प्राचार्य भरतीवरील बंदी राज्य शासनाने उठविली असली तरी सहायक प्राध्यापक भरतीवर असलेले निर्बंध अद्याप कायम आहेत. प्राध्यापक भरतीवर असलेल्या बंदीमुळे राज्यातील सहायक प्राध्यापक पदाच्या शेकडो जागा रिक्त आहेत. त्याचा मोठा परिणाम महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर होत आहे. प्राचार्य भरतीची बंदी उठविल्यानंतर आता प्राध्यापक भरतीची बंदी कधी उठणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे........... ‘‘महाविद्यालयांमध्ये प्राचार्य या संवर्गाचे पद हे एकाकी पद आहे, तसेच त्यांच्यावर कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे. त्यामुळे महाविद्यालयात रिक्त असलेली प्राचार्यांची पदे भरण्याची प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे.’’- धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण विभाग 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापक