शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack: 'सरकार तुमच्या पाठीशी', पहलगाम येथे गेलेल्या पुण्याच्या ५२० पर्यटकांना विशेष विमानाने आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:47 IST

पुण्यातून तब्बल ५२० पर्यटक पहलगामला गेल्याची माहिती समोर आली असून सर्वांना सुखरूप आणण्यात येईल, असे मोहोळ यांनी सांगितले आहे

पुणे: पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर फिरायला गेलेले पर्यटक घाबरले आहेत. पुण्यातून तब्बल ५२० पर्यटक पहलगामला गेल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून विशेष विमान करून त्यांना पुण्यात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना सुरक्षित घरी पोहचण्याचे सर्व विमान कंपन्यांशी बोलणे सुरू असून, विशेष विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पर्यटनासाठी पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक लोक जम्मू-काश्मीर येथे फिरायला गेले होते. परंतु, मंगळवारी दुर्दैवाने दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामुळे पर्यटक घाबरले आहेत. प्रत्येक जण सुखरूप घरी पोहचण्यासाठी आटापिटा करत आहे. सरकारकडून पर्यटकांना सुरक्षित आणण्यासाठी मुंबई आणि पुण्याला सोडण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी दाेन वाजता मुंबईसाठी एक विशेष विमान सोडले आहे. त्यामुळे दोनशेपेक्षा जास्त पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. पुण्यातील तीन मोठे ग्रुप अडकले असून, त्यात जवळपास दीडशे ते दोनशे पर्यटक आहेत. त्यांच्यासाठी गुरुवारी विशेष विमानाची तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील सर्व पर्यटक गुरुवारी पुण्यात विशेष विमानाने येतील. जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूपपणे आणण्याची जबाबदारी सरकारची असून, कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. फिरायला गेलेल्या नागरिकांच्या संपर्कात आम्ही आहोत. पुण्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे आणण्यासाठी विशेष विमानाची तयारी केली आहे. सर्वांना सुखरूप आणण्यात येईल. कोणीही घाबरून जाऊ नये. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाairplaneविमानmurlidhar moholमुरलीधर मोहोळJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन