शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Vinayak Mete: सरकारला शेतकऱ्यांची नाही; नवाब मलिकांचा जावई अन् आर्यन खानची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:35 IST

शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कोणी गेले नाही ना त्यांच्या सांत्वनासाठी नेते फिरकले

पुणे : शेतकरी रोज आत्महत्या करताहेत. एकट्या बीड जिल्ह्यांत आतापर्यंत १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ७० ते ७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंदच नाही. शेतकऱ्यांची लेकरं म्हणवून घेणाऱ्यासाठी ही लाज आणणारी बाब आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कोणी गेले नाही ना त्यांच्या सांत्वनासाठी नेते फिरकले. राज्य सरकरला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही. सरकारला केवळ नवाब मलिकांच्या जावई व आर्यन खानच्या चिंता असल्याची टिका शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी केली. राज्यातील विविध प्रश्ना संदर्भात रविवारी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

''राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्ठा लावली आहे. मुर्दाड मनाचं सरकार आहे.त्यांना याची लाज देखील वाटत नाही. दिवाळीत जर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही तर दिवाळी नंतर शिवसंग्राम च्य वतीने सरकार मोर्चा काढला जाईल. तो बीड मधून काढला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.'' 

छत्रपतीं शिवरायांचे स्मारक उभारायला वेळ नाही

''फडणवीस सरकारचा काळात शेतकरी आत्महत्या कमी होत होत्या. मदत देखील तत्काळ दीली जात होती.पण ठाकरे सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील गंभीर नाही. दोन महिने उलटून गेले सरकारने साधी बैठंक देखील घेतली नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय दयायचा नाही. ठाकरे सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार सर्व विषयावर बोलतात. त्यांना केवळ मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला वेळ नाही. मराठा समाजाचं आंदोलन शांत झालेले नाही. मागासवर्ग आयोगाला पैशाची कमतरता नाही. निवडणुका जवळ आल्याकी ठाकरे सरकारला शिवाजी महाराज आठवतात. शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागणाऱ्या सरकारला छत्रपतीं शिवरायांचे स्मारक उभारायला वेळ नाही.'' 

शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार 

''शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार आहे. मात्र किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचं याबाबत अदयाप कोणता निर्णय घेतला नाही. नंतर लवकरच सर्व स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. सध्या सरकारला राज्यात कोणता प्रश्न च नाही असे वाटते. आर्यन खान व समीर वानखडे ह्या प्रश्नातच सरकारला स्वारस्य आहे. ह्या प्रकरणांत जे सुरु आहे.ते खूप खालच्या पातळीवरचं लक्षण आहे असेही ते यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेस शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, बाळासाहेब चव्हाण, आदी उपस्थित होते.''

टॅग्स :Puneपुणेnawab malikनवाब मलिकAryan Khanआर्यन खानFarmerशेतकरीVinayak Meteविनायक मेटे