शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

राज्यातील लम्पी रोखण्यासाठी सरकार अपयशी; पशुवैदयकीय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचा आरोप

By अजित घस्ते | Updated: September 20, 2022 19:20 IST

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापिठाने औषोधोपचारासंबंधी या रोगावरील निश्चित केलेल्या प्रोटोकोल प्रमाणे औषधांचा व प्रतिकार शक्तीवर्धक औषधांचा साठा केला असता तर आजची गंभीर अवस्था निर्माण झाली नसती.

पुणे: पशुसंवर्धन विभागाने राज्यांच्या सीमा बंद करून आंतरराज्यीय गुरांचा व्यापार हा थेट सप्टेंबरमध्ये राेखला. मात्र, एप्रिल मधल्या राजस्थानच्या रोग प्राद्रुभावाची नोंद घेत एप्रिलमध्येच सीमा बंद केल्या असत्या लसींचा मोठया प्रमाणात साठा केला असता तर लम्पीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात इतक्या वेगाने झाला नसता. रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या प्रकियेत लसीकरण कार्यक्रमास मनुष्यबळाच्या अभावी लम्पीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे, असा आराेप पशुवैदयकीय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचे सचिव डाॅ. नारायण जाेशी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी संघाचे अध्यक्ष डाॅ. एस. कुलकर्णी, कार्यकारी अध्यक्ष डाॅ. सागर अरूटे उपस्थित हाेते. 

राज्यात लम्पीने थैमान मांडले आहे. त्या पार्श्वभूमीवर संघाच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेउन त्यांची बाजु मांडली व शासनाच्या धाेरणावर टीका केली. जाेशी म्हणाले, ‘महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापिठाने औषोधोपचारासंबंधी या रोगावरील निश्चित केलेल्या प्रोटोकोल प्रमाणे औषधांचा व प्रतिकार शक्तीवर्धक औषधांचा साठा केला असता तर आजची गंभीर अवस्था निर्माण झाली नसती. 

महाराष्ट्र राज्यातील २०१९ मध्ये केलेल्या पशुगनने नुसार महाराष्ट्रात ३३ लाख पशुधन असून त्यापैकी गोवंशीय पशुधनाची संख्या १३.९ लाख, म्हैस वर्गाची ५.६ लाख, मेंढयांची २.७ लाख आणि शेळयांची संख्या १०.६ लाख आहे. हे पशुधन राज्याच्या ६३ हजार खेडयापाडयांत आहे. या पशुधन व पक्षांना रोगप्रतिबंधक उपाययोजना व औषोधोपचार करण्याचे काम राज्यातील प्रशिक्षीत पशुधन परिवेक्षक पदवीकाधारक गेली कित्येक वर्ष करीत आहेत, असेही ते म्हणाले. 

लम्पी त्वचारोगाचा दुग्ध उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने राज्यातील पशुपालकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. या रोगावर वेळेत जागृती करुन एप्रिल मे पासूनच प्रभावी प्रचार आणि प्रसार राज्यात झाला असता तर पशुपालकांत भयाचे वातावरण निर्माण झाले नसते. महाराष्ट्रातील कृषी विदयापिठाने व मत्स्य व पशुविज्ञान विद्यापिठाने प्रशिक्षीत केलेले मनुष्य बळाचा योग्य तो वापर करण्याऐवजी प्रशासनाकडून ठेकेदार पद्धतीने भरती करून निर्बंध घातले जात आहेत. सरळ सेवा भरतीतून रिक्त पदे भरून लम्पी रोग रोखण्यासाठी प्रचार प्रसार करीत गावोगावी जाऊन प्रोबोधन करणे गरजेचे आहे, अशीही भुमिका संघाने मांडली.

टॅग्स :milkदूधPuneपुणेdoctorडॉक्टरSocialसामाजिकhospitalहॉस्पिटल