शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

दुष्काळात मंत्र्यांचे दौरे उदंड मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीही नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 18:23 IST

दुष्काळात मंत्र्यांचे अनेक दौरे झाले मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नसल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केली. साखर आयुक्त कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

पुणे : दुष्काळात मंत्र्यांचे अनेक दौरे झाले मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नसल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केली. साखर आयुक्त कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

त्यावेळी दुष्काळाच्या मुद्दयावर सरकारने केलेल्या कामाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मंत्री जात असताना अनेकदा आधीच बंदोबस्त केला जातो. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतले जाते. मंत्र्यांचे पोलीस बंदोबस्तात दौरे सुरु आहेत त्यावरून लोकांच्या मनात किती मोठा उद्रेक आहे हे लक्षात येत आहे. असा स्थितीत आचारसंहितेचा बाऊ करून दुष्काळग्रस्तांचे  अश्रू पुसण्यात सरकार अपयशी ठरले आहे. 

सक्तीची बँक वसुली, विद्यार्थ्यांची फी मोफत करणे या केवळ शाब्दिक घोषणा ठरल्या आहेत. चारा छावण्यांमध्येही शेतकऱ्यांचे हाल सुरु असून त्या छळ छावण्या आहेत की काय वेळ निर्माण झाली आहे. अशा परिथितीत सरकार काय करत आहे. काय अंमलबजावणी करायची हे सर्वांना माहिती आहे. मात्र केवळ कर्तव्य टाळण्यासाठी आचारसंहितेचा बाऊ केला जात आहे. 

पुढे त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • ८० टक्के कारखान्यांनी एफ आर पीची रक्कम अदा केली आहे. इतर कारखान्यांविषयी साखर आयुक्तांशी चर्चा. 
  • साखर आयुक्तांनी स्पष्ट आदेश देऊनही कारखानदारांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर खटले दाखल करणार 
  • शेतकऱ्यांना लवकरात लवकर एफ आर पी मिळावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न 
टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीGovernmentसरकारdroughtदुष्काळ