शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सोशल मीडियावर गुंडांचा स्वैर संचार; माहिती-तंत्रज्ञान कायदा कलम ६६ रद्द झाल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:56 IST

सोशल मीडियावर बिनधास्तपणे जातीय तेढ निर्माण होणाऱ्या, एखाद्याची बदनामी होईल, अशा स्वरूपाच्या पोस्टचे प्रमाण वाढू लागले आहे. डिजिटल यंत्रणेचा सर्वाधिक वापर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना होऊ लागला आहे. 

ठळक मुद्देगुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना होऊ लागला डिजिटल यंत्रणेचा सर्वाधिक वापर सोशल मीडियावरील गैरप्रकारांना आळा घालणारी यंत्रणा विकसित होणे अपेक्षित

पिंपरी : माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ अ सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे, या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. हे कलम रद्द झाल्यानंतर आता कसली भीती नाही, असा समज करून सोशल मीडियावर बिनधास्तपणे जातीय तेढ निर्माण होणाऱ्या, एखाद्याची बदनामी होईल, अशा स्वरूपाच्या पोस्टचे प्रमाण वाढू लागले आहे. डिजिटल यंत्रणेचा सर्वाधिक वापर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना होऊ लागला आहे. श्रेया सिंघल विरुद्ध केंद्र सरकार यांच्यातील दाव्याचा निकाल झाला. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ रद्द ठरविले. सर्वोच्च न्यायालयाने व्यापक दृष्टिकोनातून आणि नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत हक्काला बाधा पोहोचणार नाही, या उद्देशाने निर्णय घेतला. सोशल मीडियावर प्रसारित होणारे अन्य स्वरूपाचे संदेश थांबविण्याची, सोशल मीडियावरील गैरप्रकारांना आळा घालणारी यंत्रणा विकसित होणे अपेक्षित आहे, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्ती करू लागल्या आहेत. अनेकदा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एकमेकांना धमकाविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. जिवे मारण्याची धमकी देणे, असे प्रकार घडू लागले आहेत. पोलिसांना मात्र त्याआधारे कारवाई करताना अडचणी येत आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅपवर महिलांविषयी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याआधारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई कली जात असताना, भारतीय दंड संहितेची काही कलमे लावली जाऊ शकतात. माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता या दोन्ही कायद्यातील तरतुदींच्या आधारे कारवाई केली जाते. सोशल मीडियावर गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्ती हातात शस्त्र घेतलेल्याची छायाचित्र तसेच भाईगिरीचे संदेश आणि धमकावणाऱ्या आवाजातील रेकॉर्ड केलेले संवाद अशा स्वरूपातील पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर पहावयास मिळतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा सोशल मीडियावरील स्वैर संचार रोखण्याची यंत्रणा सक्षमपणे कार्यन्वीत व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान