शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर गुंडांचा स्वैर संचार; माहिती-तंत्रज्ञान कायदा कलम ६६ रद्द झाल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:56 IST

सोशल मीडियावर बिनधास्तपणे जातीय तेढ निर्माण होणाऱ्या, एखाद्याची बदनामी होईल, अशा स्वरूपाच्या पोस्टचे प्रमाण वाढू लागले आहे. डिजिटल यंत्रणेचा सर्वाधिक वापर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना होऊ लागला आहे. 

ठळक मुद्देगुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना होऊ लागला डिजिटल यंत्रणेचा सर्वाधिक वापर सोशल मीडियावरील गैरप्रकारांना आळा घालणारी यंत्रणा विकसित होणे अपेक्षित

पिंपरी : माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ अ सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे, या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. हे कलम रद्द झाल्यानंतर आता कसली भीती नाही, असा समज करून सोशल मीडियावर बिनधास्तपणे जातीय तेढ निर्माण होणाऱ्या, एखाद्याची बदनामी होईल, अशा स्वरूपाच्या पोस्टचे प्रमाण वाढू लागले आहे. डिजिटल यंत्रणेचा सर्वाधिक वापर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना होऊ लागला आहे. श्रेया सिंघल विरुद्ध केंद्र सरकार यांच्यातील दाव्याचा निकाल झाला. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ रद्द ठरविले. सर्वोच्च न्यायालयाने व्यापक दृष्टिकोनातून आणि नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत हक्काला बाधा पोहोचणार नाही, या उद्देशाने निर्णय घेतला. सोशल मीडियावर प्रसारित होणारे अन्य स्वरूपाचे संदेश थांबविण्याची, सोशल मीडियावरील गैरप्रकारांना आळा घालणारी यंत्रणा विकसित होणे अपेक्षित आहे, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्ती करू लागल्या आहेत. अनेकदा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एकमेकांना धमकाविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. जिवे मारण्याची धमकी देणे, असे प्रकार घडू लागले आहेत. पोलिसांना मात्र त्याआधारे कारवाई करताना अडचणी येत आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅपवर महिलांविषयी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याआधारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई कली जात असताना, भारतीय दंड संहितेची काही कलमे लावली जाऊ शकतात. माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता या दोन्ही कायद्यातील तरतुदींच्या आधारे कारवाई केली जाते. सोशल मीडियावर गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्ती हातात शस्त्र घेतलेल्याची छायाचित्र तसेच भाईगिरीचे संदेश आणि धमकावणाऱ्या आवाजातील रेकॉर्ड केलेले संवाद अशा स्वरूपातील पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर पहावयास मिळतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा सोशल मीडियावरील स्वैर संचार रोखण्याची यंत्रणा सक्षमपणे कार्यन्वीत व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान