शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद

By नितीश गोवंडे | Updated: May 6, 2023 17:43 IST

किंगफिशर एअरलाइन्स, जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांनी ऐन पर्यटनाच्या हंगामात याच प्रकारे, सर्वांना अडचणीत आणले होते

पुणे: गो फर्स्ट एअरलाइन्सने कोणतीही पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद केली. पुढे ही सेवा चालू राहील की नाही याबद्दल कोणतेही शाश्वती नाही. उन्हाळी सुट्यांच्या धर्तीवर सामान्य नागरिक पर्यटनाच्या निमित्ताने काही महिन्यांआधीच नियोजन करतात. गो फर्स्ट एअरलाइन्सने सर्व पर्यटकांना अचानक धक्का दिल्याने पर्यटकांसह पर्यटन कंपन्यांची (टूर्स अँड ट्रॅव्हल्स) प्रचंड तारांबळ उडाली आहे. अशा अचानक उद्भवलेल्या संकटामुळे चूक नसतानाही पर्यटन संस्थांना पर्यटकांच्या रोषाला व कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती 'टॅप'चे (ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे) अध्यक्ष दीपक पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गो फर्स्ट एअरलाइन्सने विमान सेवा बंद केल्यामुळे जे पर्यटक काश्मीर, लेह या भागात अडकले आहेत. त्यांना १० हजार रुपये किमतीच्या तिकिटाचे ३० हजारापर्यंत जास्तीचे पैसे देऊन परतीचे तिकीट घ्यावे लागत आहे. या परिस्थितीचा फायदा इतर विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या घेत आहेत. पुणे ते दुबई या प्रवासासाठी २० हजार एवढा दर आहे. तर पुणे ते दिल्ली प्रवासासाठी २५ ते ३० हजार मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत पर्यटकांची होणारी लूट थांबवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत जीवन हेंद्रे यांनी व्यक्त केले.

यापूर्वी किंगफिशर एअरलाइन्स, जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांनी ऐन पर्यटनाच्या हंगामात याच प्रकारे, सर्वांना अडचणीत आणले होते. आजपर्यंत ग्राहकांचे व पर्यटन कंपन्यांचा या विमान कंपन्यांनी एकही रुपया परत दिलेला नाही, असे किती दिवस चालणार, यांच्यावर कधी कारवाई होणार? हे होऊ नये म्हणून कधी उपाययोजना होणार का ? कारण दिवाळखोरी जाहीर करणे ही एक दिवसात होणारी बाब नक्कीच नाही, या सर्व गोष्टींची कल्पना असतानाही, यावर कारवाई न करता डोळेझाक करणे हे चुकीचे आहे अशी भावना टॅपच्या सदस्यांनी व्यक्त केली.

ग्राहकांची फसवणूक तर होत नाहीये ना..

गो फर्स्ट कंपनीच्या म्हणण्यानुसार कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. असे असून देखील कंपनी पुढील काळातील बुकिंग का घेत आहे ? हा प्रश्न उपस्थित राहतो. यावरून असे लक्षात येते की, ही ग्राहकांची फसवणूक आहे. कायद्याच्या पळवाटा शोधून करण्यात आलेला फ्रॉड आहे असे मत नीलेश भन्साळी यांनी व्यक्त केले.

पर्यटकांची दिशाभूल..

विमान कंपन्यांकडून पर्यटकांची दिशाभूल केली जाते. त्यांना सांगितले जाते की आम्ही तुमच्या तिकिटाचे पैसे रिफंड केले आहेत, पण ते पैसे त्यांच्याच आभासी अकाउंट मध्ये दिले जातात. ते पैसे कधीही बँकेत येत नाहीत, ते फक्त आणि फक्त त्याच विमान कंपन्यांची तिकीटे बुक करण्यासाठी वापरता येऊ शकतात. जर एअरलाईन कंपनीच बंद पडली, तर या आभासी अकाउंट मधील रिफंड कुठे वापरायचा यासाठी डीजीसीएने मार्गदर्शन करावे, अशी मागणी टॅपच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासीtourismपर्यटनSummer Specialसमर स्पेशल