शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

ग्लोबलायझेशनमुळे वाढतोय नात्यातला दुरावा; तीन वर्षांत पुण्यात आढळले ३१३ बेवारस रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 2:27 AM

वायसीएम रुग्णालयातील स्थिती आई वडिल होतायेत निराधार

प्रकाश गायकर पिंपरी : माणसाचे आयुष्य ग्लोबल होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाच कुणासाठी वेळ नाही. सोशल मीडियाच्या माध्यामातून जग जवळ येत आहे. मात्र येथे आई-बापाला मुलासाठी वेळ नाही, मुलाला आई-बापासाठी वेळ नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. माणूस स्वत:च्या जगामध्ये इतका हरवला आहे की, ज्या आई-बापाने हे जग दाखवले त्याच आई-वडिलांना रस्त्याच्या बाजूला सोडले जात आहे. ज्या बहिणीने हातावर राखी बांधून संरक्षणाचे वचन घेतले. त्या बहिणीला रुग्णालयात मरण्यासाठी सोडून भाऊ घरची वाट धरत आहे.

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये रोज अशा बेवारस रुग्णांना दाखल केले जाते. ज्यांना आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी आहे. मात्र त्या रुग्णाला सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. काहींची तर आर्थिक परिस्थिती नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये वायसीएममध्ये तब्बल ३१३ बेवारस रुग्णांंची नोंद आहे. तर मागील तीन महिन्यांमध्ये त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, अवघ्या तीन महिन्यांमध्ये तब्बल ९६ बेवारस रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

३१ ऑगस्ट या दिवशी दुपारी १०८ रुग्णवाहिकेने रत्नाबाई गायकवाड (वय ६०) या महिलेला वायसीएम रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या महिलेला डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र उपचार सुरू असतानाच भाऊ रुग्णालयातून निघून गेला. दोन तासांपूर्वी भावाने बहिणीला वाचविण्यासाठी दाखल केले. मात्र भाऊच गायब झाल्याने डॉक्टरही चक्रावून गेले.

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भाऊ रुग्णालयातून निवांत जाताना दिसून आले. त्यानंतर दहा दिवसांनी आपला शोध सुरू असल्याची कुणकुण या भावाला लागली आणि तो बहिणीला पाहण्यासाठी रुग्णालयात पुन्हा हजर झाला. अनेक घटनांमध्ये स्वत:चे घरचेच सोडून गेल्याचे निदर्शनास आले आहे. व्यक्ती आजारी किंवा वयस्कर असेल तर ती व्यक्ती घरात नसलेली ठीक आहे, अशी मानसिकता होत आहे. त्यासाठी अशा रुग्णांना रक्ताचीच नाती सोडून जात आहेत.संस्थेच्या माध्यमातून जे काम केले जात आहे, ते कौतुकास्पद आहे. जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिलेल्या बेवारस रुग्णांची सेवा केली जाते. नातेवाईक सोडून जात असल्याने एका रुग्णाला तीन, चार महिने रुग्णालयातच ठेवावे लागते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरही ताण येतो. ज्या रुग्णांना नातेवाईक सोडून जातात, ते आजारी असतातच असे नाही. तर त्यांना आधाराची व आश्रयाची आवश्यकता असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्यानेही काही जण सोडून जातात. - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.तिला कोणच नाही. माझ्या घरची माणसे चांगली वागत नाहीत. कुठल्यातरी सरकारी दवाखान्यात तिचा शेवट होईल हा हेतू होता. - रुग्णाचे एक नातेवाईकरिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेचा आधारवायसीएममध्ये अनेक बेवारस रुग्णांना दाखल केले जाते. त्यांना रिअल लाइफ रिअल पीपल ही संस्था मदत करते. त्यांना जेवण व त्यांची देखभाल केली जाते. रुग्णांच्या नातेवाइकांना शोधून त्यांना घरी पोहोचवणे, आश्रमात पाठवणे याची जबाबदारी संस्था घेते. तसेच उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर संस्थेमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. आतापर्यंत १०४ मृतदेहांवर संस्थेमार्फत अंत्यसंस्कार केले आहेत. यामध्ये संस्थेचे संस्थापक एम. ए. हुसैन, सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, आकाश शिरसाठ, मिलिंद माळी, दत्ता वाघमारे, कमल कांबळे, उल्हास चांगण, रेणुका शिंदे हे काम करतात.मी रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेच्या माध्यमातून वायसीएममध्ये २०१० पासून सेवा करत आहे. लोक कर्तव्य विसरले आहेत. शेकडो बेवारस रुग्ण दरवर्षी दाखल होतात. त्यापैकी अनेकांना स्वत:च्या घरच्यांनी सोडून दिलेले असते. अशा रुग्णांवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा आधार घेऊन उपचार केले जातात. त्यांना त्यांच्या घरी किंवा आश्रमामध्ये सोडले जाते. - एम. ए. हुसैन, संस्थापक रिअल लाइफ रिअल पीपल.

टॅग्स :Puneपुणे