शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

Republican Party Of India: आम्हाला जागा द्या, अन्यथा तुमचा प्रचार करणार नाही, RPI चा भाजपला कडक शब्दात इशारा

By राजू इनामदार | Updated: October 14, 2024 15:13 IST

आम्ही विधानसभेसाठी १२ जागा मागत आहोत, पण त्याबाबत महायुती एकही शब्द बोलत नाही, आंबेडकरी जनता महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

पुणे: आमचे नेते विधानसभेच्या १२ जागा मागत आहेत, त्यावर तूम्ही एक शब्दही बोलायला तयार नाही, आंबेडकरी जनतेची मते तूम्हाला हवीत, पण तळातील कार्यकर्ते वंचितच ठेवायचे आहेत, त्यामुळे आता जागा नाहीत तर मग तूमचा प्रचारही नाही अशा कडक शब्दांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या वतीने महायुतीला इशारा देण्यात आला.

भारतीय जनता पक्षाने आरपीआय बरोबर युती तर केली आहे, मात्र सत्तेतील वाटा देण्याबाबत आंबेडकरी जनतेला कायम झुलवतच ठेवले आहे, असा थेट आरोप यावेळी करण्यात आला. महायुतीतील अन्य दोन पक्षही असेच असल्याची टीका करण्यात आली. मते हवीत तर मग विधानसभेच्या किती जागा देणार ते सांगा, अन्यथा यावेळी आंबेडकरी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी गर्भित धमकीच कार्यकर्त्यांनी दिली.

पक्षाचे राज्य सचिव परशूराम वाडेकर यांनी सांगितले की, पक्षाच्या पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ही बैठक उत्स्फूर्त आहे. भाजप आणि महायुतीच्या फसवेगिरीला कार्यकर्ते आता कंटाळले आहेत. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले मागील कितीतरी दिवसांपासून पक्षासाठी विधानसभेच्या १२ जागा मागत आहेत. मात्र आमची ज्यांच्याबरोबर युती आहे तो भाजप किंवा युतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) वराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)यावर एक चकार शब्द बोलत नाहीत. जागा वाटपाच्या चर्चैतही आठवले यांना कधीच बरोबर घेतले झात नाहीत. याचा सरळ अर्थ ते आम्हाला ग्रुहित धरून आहेत असाच होतो.

आंबेडकर विचारांना विरोध असलेल्या पक्षाबरोबर युती करण्याचे राजकीय धाडस आठवले यांनी दाखवले, ते आंबेडकरी जनतेला सामाजिक आर्थिक राजकीय फायदा मिळावा म्हणून, प्रत्यक्षात मात्र भाजपला, महायुतीला राजकीय फायदा व आंबेडकरी जनता मात्र उपेक्षित अशी स्थिती आहे. लोकसभेलाही एकही जागा दिली नाही. आता विधानसभेलाही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे. आरपीआय कार्यकर्ता हे सहन करणार नाही असे वाडेकर म्हणाले. पुण्यातील कँन्टोन्मेट तसेच राज्यातील अन्य ११ विधानसभा मतदार संघ आरपीआय साठी सोडावेत, अन्यथा या विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या प्रचारासाठी एकही कार्यकर्ता बाहेर पडणार नाही असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांना पाठवले असल्याची माहिती वाडेकर यांनी दिली.

पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी १२ जागांची भूमिका जाहीर केली आहे. आम्हाला ते मान्य आहे. तीच मागणी आम्ही करत आहोत. आठवले यांची लवकरच भेट घेऊन त्यांना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार आहे.- परशूराम वाडेकर, महासचिव. आरपीआय, (आठवले गट)

टॅग्स :Puneपुणेvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार