शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

आदर्श कन्या पुरस्कार द्या - शां. ब. मुजुमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:32 IST

बिबवेवाडी : आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श पुत्र पुरस्कारासोबत आदर्श  कन्या पुरस्कार सुरू करावा, ही काळाची गरज आहे, असे मत पद्मभूषण डॉ.  शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देइंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या आदर्श माता-पिता-पुत्र  पुरस्काराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कबिबवेवाडी : आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श पुत्र पुरस्कारासोबत आदर्श  कन्या पुरस्कार सुरू करावा, ही काळाची गरज आहे, असे मत पद्मभूषण डॉ.  शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने देण्यात येणार्‍या आदर्श माता-पि ता-पुत्र पुरस्कार वितरण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.    पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती, आमदार माधुरी मिसाळ, आमदार  भीमराव तापकीर, काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र सरचिटणीस अभय छाजेड, दि  पूना र्मचंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, अखिल भारतीय जैन  कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बालचंद खरवड, महावीर प्रतिष्ठानचे  कार्याध्यक्ष विजयकांत कोठारी उपस्थित होते. या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  इंदूबाई झुंबरलाल ललवाणी व कमलबाई धनराज श्रीश्रीमाळ यांना आदर्श मा ता पुरस्कार, तर ओमप्रकाश नगराज रांका यांना आदर्श पिता व राजेश नौप तलाल सांकला यांना आदर्श पुत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, आपली आई ही आपल्याला जन्म झाल्या पासून शिकवण्यास सुरुवात करते. आपल्याला बोलायला, चालायला, प्र त्येक गोष्ट शिकवते. त्यामुळे आई ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शिक्षिका अस ते. आपण ज्या देशात जन्माला आलो, त्या देशाला देखील आपण माता  म्हणतो. आपली भारतमाता. ज्या भाषेत आई आपल्याला बोलायला शिकवते  त्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो. ज्या मातीत आपण वाढतो त्या मातीला  आपण भूमाता म्हणतो. तसेच ज्या तुळशीला प्रमुख पाहुण्यांनी पाच नद्यांतून  आणलेले पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली, त्या तुळशीलादेखील आ पण माता म्हणतो. डॉ. कांतीलाल संचेती म्हणाले, की या पुरस्कारासाठी  अभय संचेती यांनी निवड केलेले पुरस्कारार्थी हे खरोखर त्या पुरस्काराला  न्याय देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. अभय संचेती यांनी आपल्या आईच्या  स्मरणार्थ सुरू केलेला हा उपक्रम अतिशय आदर्श उपक्रम आहे.ओमप्रकाश रांका आणि राजेश सांकला यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त  केली. या पुरस्काराने झालेले कौतुक खरोखरीच विसरण्याजोगे नाही आणि  यातून अधिक प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी भवरीलाल फुलफगर, संजय चोरडिया, विजय शिंगवी, रविराज  सांकला, डॉ. अशोक संचेती, अचल जैन, सुनील नहार, वास्तुपाल रांका,  अनिल नहार, राजेश नहार, सुहास बोरा, बाळासाहेब धोका, सुभाष पगारिया,  संतोष संचेती, श्रीपाल ओस्तवाल, माणिक दुगड, गौतम बुरड, संतोष जैन,  संपतलाल बाफना, सुभाष ललवानी, सतीश श्रीश्रीमाळ, मोहनलाल संचेती, किशोर संचेती, दिलीप दर्डा, नंदकुमार चोरडिया, राजेंद्र भटेवरा, सचिन देसरडा, सुरेश वानगोता,प्रकाश दर्डा, कांतीलाल श्रीश्रीमाळ, हरकचंद देसरडा, संपत बोथरा, हरकचंद  मुथ्था, नंदकुमार संचेती, सतीश लुणिया, गिरीश भन्साळी, राजेंद्र लुणिया  आदी उपस्थित होते. किशोरजी संचेती यांनी स्वागत केले. तर मनीष संचेती  यांनी आभार मानले. किरण बोरा यांनी आईविषयीची कविता सादर केली.

ज्यांच्यामुळे मी घडलो त्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांची स्मृती कायम  सोबत राहावी आणि त्यांच्यासारख्या आदर्शवत माता-पित्यांचा सन्मान  करावा, या हेतूने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. माता-पि त्याविषयी आदर करण्याची संस्कृती अजूनही जिवंत आहे, याचा मला ठाम  विश्‍वास आहे. गेल्या दीड तपापासून हा वसा मी स्वीकारला असून, येथून  जाताना आई-वडिलांप्रती आदराची भावना घेऊन जा आणि समाजातील ही  कीड मुळापासूनच नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा.- अभय संचेती, अध्यक्ष