शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

संकटात संधी मानुन चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 19:14 IST

या उद्योगांना महाराष्ट्रात विशेषतः बारामती, इंदापूर या भागांमध्ये आणण्यासाठी शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुळे यांनी प्रयत्न करावेत..

ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांच्याकडे उद्योजकांची मागणीबारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी संवादकोरोना संक्रमणाला कारणीभुत ठरवत अनेक उद्योग चीनमधुन बाहेर पडण्याच्या तयारीत...

बारामती : कोरोना संक्रमणामुळे जगभरातील उद्योग ढासळले आहेत.अनेक उद्योग उद्धवस्त झाले आहेत.कोरोना संक्रमणाला कारणीभुत असल्याचा आरोप करीत अनेक उद्योग चीनमधुन बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. बारामतीच्या उद्योजकांनी संकटात ही संधी मानुन देशाने चीनमधुन बाहेर पडणाऱ्या उद्योगांचे स्वागत करावे. तेउद्योग बारामतीच्या रिकाम्या भूखंडात आणावे,अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन ने केली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद साधला.यावेळी असोसिएशनच्या वतीने ही मागणी करण्यात आली. बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, भारत फोर्जचे सुशांतपुस्तके, पियाजियोचे जगदीश गंधे, जीटीएन ईंजिनीयरींगचे  मिश्रा,डायनॅमिक्सचे जितेंद्र जाधव, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जेजुरी लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे आदीप्रमुख उद्योजक व पदाधिकारी या ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी झाले होते.लॉकडाऊनचा उद्योग क्षेत्रावर झालेला परिणाम, परप्रांतीय कामगार यांची मानसिकता व उपलब्धता, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपन्या करत असलेल्या उपाय योजना, महाराष्ट्र राज्यातील जादा वीजदर, तसेच लघुउद्योगांच्या अर्थकारणावर झालेला विपरीत परिणाम व इतर अनेक अनुषंगिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देश चीनमधील त्यांचे प्रकल्प बंद करून ते भारतात स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत, असे प्रकल्प महाराष्ट्रात विशेषतः बारामती, इंदापूर, फलटण, टेंभुर्णी, जेजुरी आदी ग्रामीण भागात आणण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुळे यांनी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना द्यावी अशी आग्रही मागणी असोसिएशनचे अध्यक्ष जामदार यांनी या बैठकीतकेली.  तसेच लघू उद्योगांना त्यांनी वसूल केलेली जीएसटी ची रक्कम काही कालावधीसाठी बिनव्याजी वापरण्यास मिळावी, राज्य शासनाने कर्ज हमी घेऊन लघु उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध करून द्यावे, अशा अनेक मागण्या यावेळीकरण्यात आल्या.बारामती, जेजुरी, कुरकुंभ एमआयडीसी मधील उद्योगांच्यामागण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडवण्यासाठी  प्रयत्न केलाजाईल अशी ग्वाही ,यावेळी खासदार  सुळे यांनी दिली.

टॅग्स :BaramatiबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMIDCएमआयडीसीchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या