शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या फेरपरीक्षेतही मुलींचीच आघाडी, उत्तीर्णांची टक्केवारी घटली, राज्याचा निकाल २४.९६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 02:30 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालात मुलींनीच आघाडी घेतली असून, औरंगाबाद विभाग अव्वल ठरला आहे.राज्य मंडळाकडून जुलैमध्ये घेतल्या जाणा-या फेरपरीक्षेचे यंदा दुसरे वर्ष होते. नऊ विभागीय मंडळांमधून नोंदणी केलेल्या एकूण ९४ हजार ३३६ विद्यार्थ्यांपैकी ९३ हजार २७१ जणांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी २३ हजार २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २८.७२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची टक्केवारी २३.६१ एवढी आहे. एकूण ७ हजार ८४ मुली व १६ हजार १९९ मुले उत्तीर्ण झाली आहेत. विभागनिहाय निकालामध्ये औरंगाबाद विभाग अव्वल ठरला आहे. या विभागाचा निकाल सर्वाधिक ३७ टक्के लागला असून, त्याखालोखाल नागपूरचा निकाल ३४.१४ टक्के आहे. मुंबई विभागातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, हा विभाग १८.७४ टक्के निकालासह तळाला राहिला.शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ३०.८० टक्के, कला शाखा २३.९८ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल २२.५४ टक्के आहे. व्यावसायिक शाखेचा निकाल २४.६२ टक्के लागलाआहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५१ विद्यार्थ्यांना उच्च श्रेणी मिळाली असून, ५१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर १ हजार ९१ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी आणि २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.मूळ गुणपत्रिका २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ नंतर महाविद्यालयात मिळणार.२२ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत गुणपडताळणी करता येणार.२२ आॅगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळतील.सहा विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करता येणार.उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळाल्यानंतर, पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल.

विभागनिहाय टक्केवारीविभाग परीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारीपुणे १७२८४ ४४७४ २५.८९नागपूर ९९५२ ३३९८ ३४.१४औरंगाबाद ७१३८ २६४१ ३७.००मुंबई २६७७१ ५०१६ १८.७४कोल्हापूर ८०८३ २०३४ २५.१६अमरावती ७२९८ १४१२ १९.३५नाशिक १०८८५ २७६० २५.३६लातूर ४९८१ १३६४ २७.९३कोकण ८७९ १८४ २०.९३एकूण ९३२७१ २३२८३ २४.९६

टॅग्स :Studentविद्यार्थी