शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

घुमान-पंढरपूरचा रेल्वे प्रश्न मार्गी लागणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 20:18 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे पार पडल्यानंतर घुमान रेल्वे मार्गाशी जोडले जावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती.

प्रज्ञा केळकर - सिंग 

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे पार पडल्यानंतर घुमान रेल्वे मार्गाशी जोडले जावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि घुमान रेल्वे मार्गाने जोडले जावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. ब्यास ते कादियान या रेल्वे मार्गाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामुळे घुमान-पंढरपूरचा रेल्वेचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  पंजाबच्या ज्या भूमीत संत नामदेवांनी मानवतेचा नंदादीप लावला, ती घुमाननगरी वारक-यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरशी जोडली जावी, यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंजाब आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक बंध दृढ व्हावेत, यादृष्टीने ८८ वे साहित्य संमेलन घुमनाला आयोजित करण्यात आले होते. यावेळी घुमानपर्यंत रेल्वे पोहोचावी, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती.  तत्पूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूर ते घुमान रेल्वे मार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आयुष्यातील दीर्घ काळ घुमानमध्ये वास्तव्य केले. घुमान येथील गुुरुद्वारा आणि मंदिरातून त्यांच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत. 

महाराष्ट्र आणि पंजाबमधील नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या दृष्टीने पर्यटन सोपे व्हावे, यासाठी पंढरपूर आणि घुमान रेल्वे सुरु व्हावी, अशा आशय विजयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रात नमूद केला होता. ‘सरहद संस्थेतर्फे घुमानला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. परस्पर संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने सरकारनेही सकारात्मक पाऊल उचलण्यात यावे’, अशी आशा पत्रातून व्यक्त करण्यात आली होती. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. ब्यास ते कादियान रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने घुमान ते पंढरपूर रेल्वेच्या कामालाही गती मिळेल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.विजयसिंह मोहिते-पाटील   घुमान ते पंढरपूर मार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले होते. या रेल्वे मार्गाच्या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहे. घुमानपर्यंत रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने ही मागणीही पूर्णत्वास जाईल, अशी आशा वाटते. 

टॅग्स :railwayरेल्वेPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी