शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घुमान-पंढरपूरचा रेल्वे प्रश्न मार्गी लागणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 20:18 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे पार पडल्यानंतर घुमान रेल्वे मार्गाशी जोडले जावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती.

प्रज्ञा केळकर - सिंग 

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे पार पडल्यानंतर घुमान रेल्वे मार्गाशी जोडले जावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि घुमान रेल्वे मार्गाने जोडले जावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. ब्यास ते कादियान या रेल्वे मार्गाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामुळे घुमान-पंढरपूरचा रेल्वेचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  पंजाबच्या ज्या भूमीत संत नामदेवांनी मानवतेचा नंदादीप लावला, ती घुमाननगरी वारक-यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरशी जोडली जावी, यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंजाब आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक बंध दृढ व्हावेत, यादृष्टीने ८८ वे साहित्य संमेलन घुमनाला आयोजित करण्यात आले होते. यावेळी घुमानपर्यंत रेल्वे पोहोचावी, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती.  तत्पूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूर ते घुमान रेल्वे मार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आयुष्यातील दीर्घ काळ घुमानमध्ये वास्तव्य केले. घुमान येथील गुुरुद्वारा आणि मंदिरातून त्यांच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत. 

महाराष्ट्र आणि पंजाबमधील नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या दृष्टीने पर्यटन सोपे व्हावे, यासाठी पंढरपूर आणि घुमान रेल्वे सुरु व्हावी, अशा आशय विजयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रात नमूद केला होता. ‘सरहद संस्थेतर्फे घुमानला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. परस्पर संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने सरकारनेही सकारात्मक पाऊल उचलण्यात यावे’, अशी आशा पत्रातून व्यक्त करण्यात आली होती. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. ब्यास ते कादियान रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने घुमान ते पंढरपूर रेल्वेच्या कामालाही गती मिळेल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.विजयसिंह मोहिते-पाटील   घुमान ते पंढरपूर मार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले होते. या रेल्वे मार्गाच्या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहे. घुमानपर्यंत रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने ही मागणीही पूर्णत्वास जाईल, अशी आशा वाटते. 

टॅग्स :railwayरेल्वेPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी