शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

सिंचन प्रकल्प ठेकेदारांना चालवण्यास देण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 05:35 IST

पाणी धोरण संघर्ष समितीचा आरोप

धनाजी कांबळे 

पिंपरी : महाराष्ट्रात २००५ चा कायदा लागू करून पाणी वाटप लाभधारक वापरकर्त्यांच्या हाती देण्याचे ऐतिहासिक पाऊल राज्य सरकारने उचलले होते. सहकार कायद्यानुसार पाणी वापर सोसायट्या करून या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली होती. मात्र, सरकारने नुकताच एक निर्णय घेऊन दोन-दोन सिंचन प्रकल्प ठेकेदारांना चालवण्यास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने स्वत:च केलेल्या कायद्याला खो घालण्याचा हा प्रकार असून, हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी पाणी धोरण संघर्ष मंचाने केली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ५००० हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या, महामंडळवार, प्रत्येकी दोन योजना पाणी वाटप करण्यासाठी ठेकेदारांना देण्यात याव्यात, असा निर्णय सरकारने जाहीर केला असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. पाणीवापर सोसायट्यांच्या माध्यमातून समन्यायी पद्धतीने पाणी वाटप शक्य आहे, हे आम्ही नाशिक आणि सांगली जिल्ह्यात दाखवून दिले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पाणी धोरण संघर्ष मंचाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. निवेदनावर प्रदीप पुरंदरे, भारत पाटणकर, किशोर ढमाले, धनाजी गुरव, सुरेखा दळवी, सुभाष काकुस्ते, राजन क्षीरसागर, सुनीती सु. र., विजय दिवाण आदींच्या सह्या आहेत.सिंचन प्रकल्प भाडेतत्त्वावर दिलेले नाहीराज्यातील काही सिंचन प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर ठेकेदारांना चालवण्यास देण्यात आले आहेत, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. असे काहीही घडलेले नाही. जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता आणि पाणी वाटपावरून होत असलेला संघर्ष लक्षात घेऊन, प्रायोगिक तत्त्वावर कालव्यांमधून दिल्या जाणाºया पाण्याच्या वाटपाचे अधिकार प्रायोगिक तत्त्वांवर दोन ते तीन ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाण्याची गळती थांबावी, सर्वांना समान पाणी मिळावे, जास्त वेळा शेतकऱ्यांना पाणी मिळावे, अशी अपेक्षा आहे. हा एक प्रयोग आहे. जर हा यशस्वी झाला तर, कालव्यातून दिल्या जाणाºया पाणी वाटपाचे अधिकार प्रायोगिक तत्त्वावर न ठेवता धोरण म्हणून अन्य लोकांना दिले जातील. मात्र अद्याप हे सगळे प्रयोग पातळीवर आहे. त्यामुळे त्याच्या निष्कर्षानंतरच पुढील निर्णय घेता येतील.- जयंत पाटील, जलसंपदामंत्री

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी