शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्प ठेकेदारांना चालवण्यास देण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 05:35 IST

पाणी धोरण संघर्ष समितीचा आरोप

धनाजी कांबळे 

पिंपरी : महाराष्ट्रात २००५ चा कायदा लागू करून पाणी वाटप लाभधारक वापरकर्त्यांच्या हाती देण्याचे ऐतिहासिक पाऊल राज्य सरकारने उचलले होते. सहकार कायद्यानुसार पाणी वापर सोसायट्या करून या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली होती. मात्र, सरकारने नुकताच एक निर्णय घेऊन दोन-दोन सिंचन प्रकल्प ठेकेदारांना चालवण्यास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने स्वत:च केलेल्या कायद्याला खो घालण्याचा हा प्रकार असून, हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी पाणी धोरण संघर्ष मंचाने केली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ५००० हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या, महामंडळवार, प्रत्येकी दोन योजना पाणी वाटप करण्यासाठी ठेकेदारांना देण्यात याव्यात, असा निर्णय सरकारने जाहीर केला असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. पाणीवापर सोसायट्यांच्या माध्यमातून समन्यायी पद्धतीने पाणी वाटप शक्य आहे, हे आम्ही नाशिक आणि सांगली जिल्ह्यात दाखवून दिले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पाणी धोरण संघर्ष मंचाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. निवेदनावर प्रदीप पुरंदरे, भारत पाटणकर, किशोर ढमाले, धनाजी गुरव, सुरेखा दळवी, सुभाष काकुस्ते, राजन क्षीरसागर, सुनीती सु. र., विजय दिवाण आदींच्या सह्या आहेत.सिंचन प्रकल्प भाडेतत्त्वावर दिलेले नाहीराज्यातील काही सिंचन प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर ठेकेदारांना चालवण्यास देण्यात आले आहेत, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. असे काहीही घडलेले नाही. जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता आणि पाणी वाटपावरून होत असलेला संघर्ष लक्षात घेऊन, प्रायोगिक तत्त्वावर कालव्यांमधून दिल्या जाणाºया पाण्याच्या वाटपाचे अधिकार प्रायोगिक तत्त्वांवर दोन ते तीन ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाण्याची गळती थांबावी, सर्वांना समान पाणी मिळावे, जास्त वेळा शेतकऱ्यांना पाणी मिळावे, अशी अपेक्षा आहे. हा एक प्रयोग आहे. जर हा यशस्वी झाला तर, कालव्यातून दिल्या जाणाºया पाणी वाटपाचे अधिकार प्रायोगिक तत्त्वावर न ठेवता धोरण म्हणून अन्य लोकांना दिले जातील. मात्र अद्याप हे सगळे प्रयोग पातळीवर आहे. त्यामुळे त्याच्या निष्कर्षानंतरच पुढील निर्णय घेता येतील.- जयंत पाटील, जलसंपदामंत्री

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी