शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अकरावी सायन्सला प्रवेश घ्या, अन् परीक्षेलाच महाविद्यालयात या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 08:42 IST

महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा आणि थेट परीक्षेलाच कॉलेजमध्ये जायचे...

पुणे : नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. शहरात कला, विज्ञान, वाणिज्य शाखेचे प्रवेश सुरू झाले आहेत. स्वयंअर्थसहाय्य असलेल्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा आणि थेट परीक्षेलाच कॉलेजमध्ये जायचे, असा फंडा या महाविद्यालयांमध्ये वापरला जात आहे. विशेषकरून विज्ञान शाखेत हे हाेताना दिसून येत आहे.

बारावीनंतर अनेक विद्यार्थी हे मेडिकलला जायचे असल्यास बारावीची परीक्षा नावालाच देतात. त्यापेक्षा त्यांचा कल हा नीट किंवा इंजिनिअरिंगला जायचे असल्यास जेईई परीक्षा देण्याकडे असताे. म्हणून केवळ नावाला ही परीक्षा द्यायची. काॅलेज बंद करायचे असा एक ट्रेंड पडल्याचे दिसून येत आहे. म्हणून या महाविद्यालयांत उपस्थितीचे बंधन व सायन्सच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश हे नावालाच असतात.

उपस्थिती अनिवार्यता नावालाच

परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी नियमानुसार विद्यार्थ्यांची महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. नोकरी, व्यवसाय अथवा खासगी संस्थेमध्ये कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या निमित्ताने विविध प्रवेश परीक्षांचा अभ्यास करत महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.

सायन्सचे विद्यार्थी थेट परीक्षेलाच महाविद्यालयात

विज्ञान शाखेचे विद्यार्थी थेट परीक्षेलाच येत असल्याचे दिसतात. खरे पाहता या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहणे व प्रात्यक्षिक पूर्ण करणे आवश्यक असते; मात्र काही महाविद्यालयांकडून त्यांना सूट देण्यात येते.

आर्ट्स-कॉमर्सची उपस्थिती चांगली

अकरावी, बारावी असो की पदवीचे शिक्षण, त्यासाठी प्रवेश घ्यायचा अन् थेट परीक्षेलाच महाविद्यालयात जायचे, असा प्रकार विद्यार्थ्यांकडून वाढत असले तरी आर्ट्स व काॅमर्सच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र चांगली असते.

मला वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा द्यायची असल्याने मला नावापुरते विज्ञान विषयात १२ वी करायची आहे. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही; परंतु माझे भविष्य प्रवेश प्रक्रियेवर अवलंबून असल्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

- रवींद्र शिंदे, विद्यार्थी

विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहावे लागते. परंतु पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही महाविद्यालये त्यांना हजेरीबाबत सांभाळून घेतात; परंतु विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित रहावे असा नेहमीच आग्रह असतो. त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञानHSC / 12th Exam12वी परीक्षा