शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अकरावी सायन्सला प्रवेश घ्या, अन् परीक्षेलाच महाविद्यालयात या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 08:42 IST

महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा आणि थेट परीक्षेलाच कॉलेजमध्ये जायचे...

पुणे : नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. शहरात कला, विज्ञान, वाणिज्य शाखेचे प्रवेश सुरू झाले आहेत. स्वयंअर्थसहाय्य असलेल्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा आणि थेट परीक्षेलाच कॉलेजमध्ये जायचे, असा फंडा या महाविद्यालयांमध्ये वापरला जात आहे. विशेषकरून विज्ञान शाखेत हे हाेताना दिसून येत आहे.

बारावीनंतर अनेक विद्यार्थी हे मेडिकलला जायचे असल्यास बारावीची परीक्षा नावालाच देतात. त्यापेक्षा त्यांचा कल हा नीट किंवा इंजिनिअरिंगला जायचे असल्यास जेईई परीक्षा देण्याकडे असताे. म्हणून केवळ नावाला ही परीक्षा द्यायची. काॅलेज बंद करायचे असा एक ट्रेंड पडल्याचे दिसून येत आहे. म्हणून या महाविद्यालयांत उपस्थितीचे बंधन व सायन्सच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश हे नावालाच असतात.

उपस्थिती अनिवार्यता नावालाच

परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी नियमानुसार विद्यार्थ्यांची महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. नोकरी, व्यवसाय अथवा खासगी संस्थेमध्ये कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या निमित्ताने विविध प्रवेश परीक्षांचा अभ्यास करत महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.

सायन्सचे विद्यार्थी थेट परीक्षेलाच महाविद्यालयात

विज्ञान शाखेचे विद्यार्थी थेट परीक्षेलाच येत असल्याचे दिसतात. खरे पाहता या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहणे व प्रात्यक्षिक पूर्ण करणे आवश्यक असते; मात्र काही महाविद्यालयांकडून त्यांना सूट देण्यात येते.

आर्ट्स-कॉमर्सची उपस्थिती चांगली

अकरावी, बारावी असो की पदवीचे शिक्षण, त्यासाठी प्रवेश घ्यायचा अन् थेट परीक्षेलाच महाविद्यालयात जायचे, असा प्रकार विद्यार्थ्यांकडून वाढत असले तरी आर्ट्स व काॅमर्सच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र चांगली असते.

मला वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा द्यायची असल्याने मला नावापुरते विज्ञान विषयात १२ वी करायची आहे. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही; परंतु माझे भविष्य प्रवेश प्रक्रियेवर अवलंबून असल्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

- रवींद्र शिंदे, विद्यार्थी

विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहावे लागते. परंतु पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही महाविद्यालये त्यांना हजेरीबाबत सांभाळून घेतात; परंतु विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित रहावे असा नेहमीच आग्रह असतो. त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञानHSC / 12th Exam12वी परीक्षा