शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

'कचरा करण्यात कचरेनात पुणेकर'; लॉकडाऊन शिथिल होताच दिवसाकाठी 100 मेट्रिक टनांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 12:15 IST

रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर हवे नियंत्रण

लक्ष्मण मोरे- 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील कचऱ्याचे प्रमाण प्रतिदिन जवळपास ४५० ते ५०० मेट्रिक टनांनी कमी झाले होते. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन १५०० ते १६०० मेट्रिक टनांच्या दरम्यान कचरा निर्माण होत होता. परंतु, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रस्त्यावरील कचऱ्यामध्ये वाढ होत चालली असून दिवसाकाठी १०० ते १२५ मेट्रिक टन कचरा दररोज वाढत आहे.पुणे शहरात दिवसाकाठी २ हजार ते २१०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा देणे बंधनकारक आहे. या कचऱ्यावर पालिकेकडून पूर्ण क्षमतेने प्रक्रिया केली जात आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे नागरिक बाहेर पडू शकत नव्हते. तसेच, दुकाने, मॉल्स, सिनेमगृहे, हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, व्यापारी पेठा, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणांहून जमा होणारा कचरा पूर्णपणे बंद झाला. यासोबतच नागरिक घरातच बसून असल्याने ओल्या कचऱ्याचे प्रमाण मात्र प्रमाणात वाढले होते. 

लॉकडाऊनच्या काळात घरोघर जाऊन कचरा गोळा करणारी स्वच्छ संस्थेची यंत्रणा आणि पालिकेची सफाई यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. सोसायट्या आणि घरांमधून जमा होणारा कचरा साधारणपणे १५०० ते १६०० मेट्रिक टनांच्या दरम्यान आहे. लॉकडाऊनच्या काळात याच दरम्यान कचरा निर्माण होत होता. त्यामुळे ४५० ते ५०० मेट्रिक टन कचरा कमी झाला होता. यातील १५० ते १८० मेट्रिक टन कचरा हॉटेल्समधून निर्माण होतो. पालिकेच्या २२ गाड्या हा कचरा एरवी गोळा करून प्रक्रियेसाठी पाठवितात. हॉटेल्स १०० टक्के बंद असल्याने हा कचरा येणेही बंद झाले होते. उर्वरित ३२० ते ३५० मेट्रिक टन कचरा हा कचरा बाजारपेठामधून निर्माण होणारा आणि रस्त्यावर टाकला जाणारा कचरा असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेचा घनकचरा विभाग भविष्यात हा कचरा रस्त्यावर येऊ नये आणि तो पालिकेच्या यंत्रणेद्वारे गोळा केला जावा यासाठी प्रयत्न करणार आहे. --------/-------शहरात दिवसाकाठी २ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. लॉकडाऊनच्या काळात तो ४५० ते ५०० मेट्रिक टनांच्या आसपास कमी झाला. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच नागरिक बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा प्रतिदिन १०० ते १२५ मेट्रिक टन कचरा रस्त्यावर येऊ लागला आहे. नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी हा कचरा रस्त्यावर न टाकता पालिकेच्या यंत्रणेला दिल्यास रस्त्यांवर स्वच्छता राहील.- ज्ञानेश्वर मोळक, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग--------/-------प्रतिदिन निर्माण होणारा कचरा - २,००० मेट्रिक टनप्रतिदिन लॉकडाऊनमधील कचरा - १५०० मेट्रिक टन-------/------प्रतिदिन कमी झालेला कचरा - ५०० मेट्रिक टनहॉटेल्समधून कमी झालेला - १५० ते १८० मेट्रिक टनरस्त्यावर टाकला जाणारा - ३२० ते ३५० मेट्रिक टन------/-------

रस्त्यावर जमा होणाऱ्या कचऱ्यामागील प्रमुख कारणे१. पालिकेच्या यंत्रणेद्वारे कचरा न देणे.२. रात्री-बेरात्री गुपचूप रस्त्यावर कचरा फेकणे३. पथारीधारक, दुकानदारांकडून टाकला जाणारा कचरा.४. खरेदीदारांनी रस्त्यावर कचरा फेकणे.५. नागरिकांमध्ये असलेला स्वयंशिस्तीचा अभाव. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न